शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

स्फोटासोबत जातीय दंगलीचेही कारस्थान

By admin | Updated: July 16, 2016 03:23 IST

पवित्र रमजान महिन्यात दहशतवादी हल्ला करवून घ्यायचा आणि पाठोपाठ महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवायच्या, त्यातून निरपराधांचे बळी घेत अराजकता निर्माण करायची

नरेश डोंगरे,   नागपूर पवित्र रमजान महिन्यात दहशतवादी हल्ला करवून घ्यायचा आणि पाठोपाठ महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवायच्या, त्यातून निरपराधांचे बळी घेत अराजकता निर्माण करायची, असे दुहेरी कुटील कारस्थान आयएसआयएसने रचले होते. मात्र, गोंधळलेल्या नासेरबिन अबूबकर याफई-चाऊस (वय २१) याला घाईगडबडीने बॉम्ब बनविताआला नाही. त्यामुळे आयएसआयएसचे मनसुबे प्रत्यक्षात आले नाही आणि महाराष्ट्रएका मोठ्या षड्यंत्रापासूनबचावला. परभणीतून एटीएसनेअटक केलेल्या नासेरबिनच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून एटीएसच्या ताब्यात असलेल्या चाऊसकडून तपास पथकाच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती आली आहे. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, चाऊस गेल्या वर्षभरापासून इसिसच्या (फारुखच्या) संपर्कात होता. ‘आपल्या लोकांवर खूप अत्याचार होत आहे. त्यांची मदत करण्यासाठी आपण पुढे आलेच पाहिजे, अशी चाऊसची मानसिकता बनवून घेण्यात फारुखने यश मिळवले होते. ‘हम अपने कौम के लिए कुछ कर दिखायेंगे’ असे फारुखच्या पुरत्या प्रभावात असलेल्या चाऊसने ठरवले होते. आपल्यावर कोण, कुठे आणि कसा अत्याचार करीत आहे, हे समजून घेण्याऐवजी फारुखने डोक्यात भरविल्यानुसार महाराष्ट्रात मोठा घातपात घडवून आणण्याची तयारी चाऊसने केली होती. त्याला फारुख बॉम्ब कसा बनवायचा, त्याचा स्फोट कसा घडवून आणायचा, त्याचे आॅनलाईन प्रशिक्षण देत होता. त्यासाठी चाऊसने साहित्य खरेदी केले होते. मात्र, आॅनलाईन प्रशिक्षणामुळे अनेक बाबी चाऊसला कळल्याच नाही. त्यामुळेच बॉम्ब बनविण्याचा आणि रमजान महिन्यात त्याचा स्फोट घडवून आणायचा फारुखचा अर्थात इसिसचा कट पूर्णत्वाला जाऊ शकला नाही.