शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

‘माकपा’ची आक्रमक भूमिका

By admin | Updated: August 3, 2015 01:14 IST

जमीन अधिग्रहण विधेयक कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेत मंजूर होऊ दिले जाणार नाही. कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा अधिकार हिरावून घेणारे

अलिबाग : जमीन अधिग्रहण विधेयक कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेत मंजूर होऊ दिले जाणार नाही. कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा अधिकार हिरावून घेणारे भाजपा सरकार हे बहिरे झाले आहे. त्यांना जनतेचा आवाज ऐकविण्यासाठी २ सप्टेंबरला सर्वांनी रस्त्यावर उतरून भारत बंद करा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी केले.जनतेचा अधिकार हिरावून घेत गरीब आणि धनिकांसाठी अशा दोन भारतांची निर्मिती करणाऱ्या भाजपा सरकारला रोखण्यासाठी डाव्या विचारांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ६८ वा वर्धापनदिन अलिबाग येथील समुद्र किनारी पार पडला. त्या वेळी खासदार येचुरी बोलत होते. आपल्या २० मिनिटांच्या भाषणात खासदार येचुरी यांनी मोदी सरकारवर जबरदस्त तोफ डागली. मोदी सरकार भारतामध्ये ज्या नीती लागू करीत आहे त्या शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचा विरोधातील आहेत. त्यांची आर्थिक नीती देशासाठी अतिशय घातक आहेत. निवडून येण्यापूर्वी जनतेला दिलेली आश्वासने मोदी सरकारने पाळलेली नाहीत. राज्यसभेत फक्त एकदाच ते उपस्थित राहिले आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. परदेशातील काळा पैसा परत आणण्याची भाषा केली जात आहे, परंतु आधी परदेशात गेलेल्या मोदींना परत आणा अशी कोपरखळी खासदार येचुरी यांनी मोदींच्या सततच्या परदेशवारीविरोधात लगावली. पाच लाख करोड रुपयांची करामध्ये भांडवलदारांना मोदी सरकार सूट देत आहे, तर दुसरीकडे गरिबांची सबसिडी काढून घेत आहे. देशात पैशाची कमी नसून योग्य नीतीची आवश्यकता आहे. यासाठी देशात तिसरी आघाडी करावीच लागणार असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)