शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

‘माकपा’ची आक्रमक भूमिका

By admin | Updated: August 3, 2015 01:14 IST

जमीन अधिग्रहण विधेयक कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेत मंजूर होऊ दिले जाणार नाही. कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा अधिकार हिरावून घेणारे

अलिबाग : जमीन अधिग्रहण विधेयक कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेत मंजूर होऊ दिले जाणार नाही. कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा अधिकार हिरावून घेणारे भाजपा सरकार हे बहिरे झाले आहे. त्यांना जनतेचा आवाज ऐकविण्यासाठी २ सप्टेंबरला सर्वांनी रस्त्यावर उतरून भारत बंद करा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी केले.जनतेचा अधिकार हिरावून घेत गरीब आणि धनिकांसाठी अशा दोन भारतांची निर्मिती करणाऱ्या भाजपा सरकारला रोखण्यासाठी डाव्या विचारांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ६८ वा वर्धापनदिन अलिबाग येथील समुद्र किनारी पार पडला. त्या वेळी खासदार येचुरी बोलत होते. आपल्या २० मिनिटांच्या भाषणात खासदार येचुरी यांनी मोदी सरकारवर जबरदस्त तोफ डागली. मोदी सरकार भारतामध्ये ज्या नीती लागू करीत आहे त्या शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचा विरोधातील आहेत. त्यांची आर्थिक नीती देशासाठी अतिशय घातक आहेत. निवडून येण्यापूर्वी जनतेला दिलेली आश्वासने मोदी सरकारने पाळलेली नाहीत. राज्यसभेत फक्त एकदाच ते उपस्थित राहिले आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. परदेशातील काळा पैसा परत आणण्याची भाषा केली जात आहे, परंतु आधी परदेशात गेलेल्या मोदींना परत आणा अशी कोपरखळी खासदार येचुरी यांनी मोदींच्या सततच्या परदेशवारीविरोधात लगावली. पाच लाख करोड रुपयांची करामध्ये भांडवलदारांना मोदी सरकार सूट देत आहे, तर दुसरीकडे गरिबांची सबसिडी काढून घेत आहे. देशात पैशाची कमी नसून योग्य नीतीची आवश्यकता आहे. यासाठी देशात तिसरी आघाडी करावीच लागणार असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)