शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश हत्याबंदीने फरक पडणार नाही

By admin | Updated: April 13, 2015 05:42 IST

इस्लामचा खानपानाबाबत कसलाच आग्रह नसल्याने राज्यातील गोवंश हत्याबंदीचा मुसलमानांवर काडीमात्र परिणाम होणार नाही.

मुंबई : इस्लामचा खानपानाबाबत कसलाच आग्रह नसल्याने राज्यातील गोवंश हत्याबंदीचा मुसलमानांवर काडीमात्र परिणाम होणार नाही. गोवंश हत्याबंदीला मुस्लीम समाजाशी जोडून राज्य सरकार स्वत:चा अजेंडा राबवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात भरविलेल्या मुस्लीम आरक्षण परिषदेत मलिक बोलत होते.मराठा समाजाबरोबर मुस्लीम समाजाचे आरक्षण पुन्हा एकदा बहाल करण्याच्या मागणीसाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते तारीख अन्वर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. माजिद मेनन यांच्यासह मोठ्या प्रमाणावर मुस्लीम नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना सर्वच नेत्यांनी मुस्लीम आरक्षणाची मागणी करताना राज्य सरकारवर मुस्लीमविरोधी धोरणाचा आरोप केला. एकीकडे मुस्लिमांचे आरक्षण मागे घेतानाच राज्य सरकारने गोवंश हत्याबंदीचा निर्णय जाहीर केला. गोवंश हत्याबंदीचा निर्णय मुस्लिमांशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. इस्लाममध्ये खाण्याबाबत निर्बंध नाहीत. गोवंश हत्याबंदीचा फटका मुस्लिमांना नव्हे, तर राज्यातील हिंदू शेतकऱ्यांना बसणार आहे. येत्या १० वर्षांत या निर्णयाचे विपरीत परिणाम दिसतील, असा दावा मलिक यांनी या वेळी केला. (प्रतिनिधी)