शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

गोवंश हत्याबंदीने फरक पडणार नाही

By admin | Updated: April 13, 2015 05:42 IST

इस्लामचा खानपानाबाबत कसलाच आग्रह नसल्याने राज्यातील गोवंश हत्याबंदीचा मुसलमानांवर काडीमात्र परिणाम होणार नाही.

मुंबई : इस्लामचा खानपानाबाबत कसलाच आग्रह नसल्याने राज्यातील गोवंश हत्याबंदीचा मुसलमानांवर काडीमात्र परिणाम होणार नाही. गोवंश हत्याबंदीला मुस्लीम समाजाशी जोडून राज्य सरकार स्वत:चा अजेंडा राबवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात भरविलेल्या मुस्लीम आरक्षण परिषदेत मलिक बोलत होते.मराठा समाजाबरोबर मुस्लीम समाजाचे आरक्षण पुन्हा एकदा बहाल करण्याच्या मागणीसाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते तारीख अन्वर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. माजिद मेनन यांच्यासह मोठ्या प्रमाणावर मुस्लीम नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना सर्वच नेत्यांनी मुस्लीम आरक्षणाची मागणी करताना राज्य सरकारवर मुस्लीमविरोधी धोरणाचा आरोप केला. एकीकडे मुस्लिमांचे आरक्षण मागे घेतानाच राज्य सरकारने गोवंश हत्याबंदीचा निर्णय जाहीर केला. गोवंश हत्याबंदीचा निर्णय मुस्लिमांशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. इस्लाममध्ये खाण्याबाबत निर्बंध नाहीत. गोवंश हत्याबंदीचा फटका मुस्लिमांना नव्हे, तर राज्यातील हिंदू शेतकऱ्यांना बसणार आहे. येत्या १० वर्षांत या निर्णयाचे विपरीत परिणाम दिसतील, असा दावा मलिक यांनी या वेळी केला. (प्रतिनिधी)