शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

विदेशांतही गोहत्या हे पाप मानतात

By admin | Updated: October 25, 2015 01:33 IST

गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरीमधील मुस्लीम व्यक्तीच्या हत्येनंतर राजकारण ढवळून निघाले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागपूर : गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरीमधील मुस्लीम व्यक्तीच्या हत्येनंतर राजकारण ढवळून निघाले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गोहत्याबंदीचे समर्थन केले आहे. अफ्रिकेतील देशांत हलाखीच्या परिस्थितीत गायीचे रक्त प्राशन करण्यात येते, परंतु त्या बदल्यात तिचे पोषण करण्यात येते. गाईला मारणे तेथेही पाप समजले जाते, अशा शब्दांत त्यांनी गोहत्याबंदीवर भाष्य केले. नागपुरातील आर. एस. धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘आयसीसीएस’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज्) संयुक्त विद्यमाने ‘प्राचीन भारतीय संस्कृतीचे जगातील प्रतिध्वनी’ या विषयावर शनिवारपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून डॉ. भागवत बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा हे उपस्थित होते. भारताला पुरातन संस्कृती लाभली आहे. भारताच्या संस्कृतीत वैश्विक दृष्टी आहे अन् जगाला आज तिची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर देशातील संस्कृतीचा प्रसार होणे अपेक्षित होते. परंतु व्यक्तिवाद व कुटुंबवादावर जास्त भर देण्यात आल्याने संस्कृतीचे पोषण झालेच नाही. अगदी देशातील स्वातंत्र्यसंग्रामात लढणाऱ्या व्यक्तींवर ‘नेहरू मेमोरिअल’च्या माध्यमातून प्रकाश टाकला तरी भगवीकरणाचा आरोप होतो. संस्कृतीची व्याख्या आपल्या देशात करणे कठीणच आहे, असे महेश शर्मा म्हणाले. (प्रतिनिधी)भागवतांचे ‘गरुडा’स्त्रदेशात प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असलेली नावे देण्यावर विवाद होतो त्याबद्दल डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी भाष्य केले. इंडोनेशियामध्ये आघाडीची विमानकंपनी ‘गरुडा-इंडोनेशिया’ हिला पुराणांमधील गरुडाचे स्थान लक्षात घेऊन नाव देण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात अशी नावे देण्याचा प्रयत्न झाला तर मात्र गोंधळाला सुरुवात होते, असे ते म्हणाले. त्यांचा रोख केंद्रातील विरोधी पक्ष व डाव्या विचारसरणीच्या पक्षांवर होता. डॉ. महेश शर्मा यांनीदेखील सरसंघचालकांचीच री ओढत असे प्रयत्न झाले तर भगवीकरणाचे आरोप होतात असे वक्तव्य केले. परंतु जर नवीन प्रकल्पांना अशी भारतीय संस्कृतीशी जुळलेली नावे देण्याचा प्रस्ताव आला तर त्यांचा सकारात्मकपणे विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.