शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचा हमीभाव उत्पादन खर्चाएवढाही नाही

By admin | Updated: February 6, 2015 02:22 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळय़ात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शेतक-यांची व्यथा.

विवेक चांदूरकर / अकोला:सर्व राज्यांमधील कापूस पिकाचा उत्पादन खर्च आणि उत्पादकता लक्षात घेऊन केंद्र सरकार हमी भाव जाहीर करते. राज्यात कापूस हे प्रमुख पीक असले, तरी या पिकाचे उत्पादन कमी आहे. दुसरीकडे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमी भावात शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच गुरूवारी अकोला येथे दिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत समारोहाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेती व्यवसायातील समस्या व त्यावरील उपाययोजनांवर विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणाले, कापूस हे राज्यातील प्रमुख पीक आहे. कापसाचे हमी भाव केंद्र सरकार घोषित करते. हे भाव घोषित करताना केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांमधील कापसाचे उत्पादन व त्यासाठी येणारा खर्च याची माहिती घेऊन शेतकर्‍यांना परवडेल असे हमी भाव जाहीर करते. यावर्षी कापसाला केंद्र सरकारने ४0५0 रुपये हमी भाव जाहीर केला. राज्यात कापसाचे एकरी उत्पादन अन्य राज्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शासन जाहीर करीत असलेले हमी भाव शेतकर्‍यांना परवडत नाहीत, तसेच या हमी भावात शेतकर्‍यांना दोन पैसेही उरत नाहीत. राज्यात बीटी बियाण्यांमुळे कापसाचे उत्पादन वाढले खरे, मात्र उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे उत्पादन वाढविणार्‍या बियाण्यांवर आणखी संशोधन करण्याची गरज आहे. विद्यापीठाने ते काम करायला हवे. शेतकर्‍यांनीही उत्पादन वाढविण्यावर भर द्यायला हवा. नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करण्याची गरज असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. विद्यापीठाने केलेले संशोधन केवळ कागदावर असून, ते शेतात जाणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.