शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयांनी आपल्या मर्यादेत राहावं- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 06:28 IST

आपल्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत न्यायसंस्थेविषयी आपले मत मांडले.

मुंबई : एखाद्या घटनेशी ज्याचा संबंध नसताना, ती व्यक्ती ‘पार्टी’ नसताना जर न्यायालयाने आदेश दिले तर त्या व्यक्तीवर ते अन्याय केल्यासारखे आहे असे सर्वोच्च न्यायालयाचे मत असल्याचे सांगत न्यायमूर्तींनी आपल्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधासभेत न्यायसंस्थेविषयी आपले मत मांडले.राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. दाभोलकर, पानसरे खटल्याच्या सुनावणीत मुख्यमंत्री एका पक्षाचे आहेत का? असे विधान मुंबई उच्च न्यायालयाने केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांबद्दल असे बोलणे हा राज्याचा अवमान आहे, असे विधान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. तोच धागा पकडत फडणवीस म्हणाले, दाभोलकर, पानसरे प्रकरणात एक तपास सीबीयआयकडे तर एक तपास सीआयडीकडे आहे. चौकशी होत असताना त्यात शासनाला कोणतेही निर्देश देता येत नाहीत. मुख्यमंत्र्यांचा तर कुठेही संबंध येत नाही. न्यायमूर्ती लेखी आदेशाशिवाय जे काही बोलतात तो आदेशाचा भाग नसतो आणि ते न्यायालयाचे मतही नसते असे स्पष्ट मत सर्वाेच्च न्यायालयाने नोंदवलेले आहे, याकडेही फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.‘माध्यमांनीही प्रगल्भता दाखवावी’न्यायालये, प्रशासन व विधिमंडळ या तीन संस्थांनी मर्यादेत राहून काम करावे, तिघांनीही एकमेकांचा सन्मान ठेवला पाहिजे. न्यायसंस्थेने एक दर्जा टिकवून ठेवला आहे, त्याचा आपल्याला अभिमान आहेच, पण अशा घटनांचे रिपोर्टिंग करताना माध्यमांनीही प्रगल्भता दाखवली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस