शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जात पडताळणीत न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली

By admin | Updated: June 9, 2014 01:15 IST

जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली करून अवैधपणे दावे फेटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामुळे उमेदवारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

धक्कादायक : अवैधपणे फेटाळले जाताहेत दावेराकेश घानोडे - नागपूरजात प्रमाणपत्र पडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली करून अवैधपणे दावे फेटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले  आहे. यामुळे उमेदवारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘माधुरी पाटील वि. महाराष्ट्र शासन’ प्रकरणात जात वैधता प्रमाणपत्राच्या दाव्यावर निर्णय घेण्यापूर्वी काय काय करावे,  यासंदर्भात दिशानिर्देश दिले आहेत. परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करीत नसल्याचे आढळून आले  आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलीकडेच समितीच्या निर्णयाविरुद्धची अनेक प्रकरणे निकाली काढताना समितीकडून सर्वोच्च  न्यायालयाच्या निर्देशांचे पालन झाले नसल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. यावरून समितीच्या भोंगळ कारभाराची प्रचिती आली आहे. एका प्रकरणात नागपूर विभागीय अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २९ मे १९९९ रोजी भंडारा येथील विद्यार्थी नूपेंद्र यादवराव  नंदनवारचा हलबा अनुसूचित जमातीचा दावा फेटाळला होता.  याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ‘व्हिजिलन्स सेल’ने  चौकशी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आई-वडील व जवळच्या नातेवाईकांचे बयाण नोंदविले नाही. तसेच सेलमध्ये संशोधन  अधिकार्‍याचा समावेश नव्हता, असे त्याचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात प्रकरणातील तथ्य पडताळल्यानंतर याचिका अंशत: स्वीकारून समितीचा निर्णय रद्द केला आणि प्रकरण नव्याने  चौकशी करण्यासाठी समितीकडे परत पाठविले. याचिकाकर्ता समितीपुढे उपस्थित झाल्यानंतर एक वर्षात दावा निकाली काढण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. नागपूर येथील रमेश हिरामण  कोहाड, राजेंद्रकुमार रेखाराम बोकडे, उमरेड येथील सीता ज्ञानदेव पौनीकर आदींच्या समान विषयावरील याचिकाही न्यायालयाने समान आदेशान्वये  निकाली काढल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशजातीच्या दाव्याचा तपास करण्यासाठी प्रत्येक संचालनालयाने वरिष्ठ पोलीस उपअधीक्षकाच्या नेतृत्वाखाली ‘व्हिजिलन्स सेल’ स्थापन करावा.  सेलमध्ये आवश्यक संख्येत पोलीस निरीक्षक असावेत. पोलीस निरीक्षकाने अर्जदाराच्या रहिवासी भागात जावे. व्हिजिलन्स अधिकार्‍याने अर्जदाराच्या  दाव्याची व्यक्तिश: पडताळणी करावी. आवश्यक तथ्य गोळा करावे. शाळेचा अभिलेख, जन्म नोंदणी इत्यादी बाबी तपासाव्यात. उमेदवाराचे  आई-वडील, पालक, नातेवाईक किंवा अर्जदाराच्या सामाजिक दर्जाची माहिती असलेल्या अन्य व्यक्तीचे बयाण नोंदवावे. यानंतर संचालनालयात  अहवाल सादर करावा. याशिवायही विविध प्रकारचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.