शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीत न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली

By admin | Updated: June 9, 2014 01:15 IST

जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली करून अवैधपणे दावे फेटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामुळे उमेदवारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

धक्कादायक : अवैधपणे फेटाळले जाताहेत दावेराकेश घानोडे - नागपूरजात प्रमाणपत्र पडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली करून अवैधपणे दावे फेटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले  आहे. यामुळे उमेदवारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘माधुरी पाटील वि. महाराष्ट्र शासन’ प्रकरणात जात वैधता प्रमाणपत्राच्या दाव्यावर निर्णय घेण्यापूर्वी काय काय करावे,  यासंदर्भात दिशानिर्देश दिले आहेत. परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करीत नसल्याचे आढळून आले  आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलीकडेच समितीच्या निर्णयाविरुद्धची अनेक प्रकरणे निकाली काढताना समितीकडून सर्वोच्च  न्यायालयाच्या निर्देशांचे पालन झाले नसल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. यावरून समितीच्या भोंगळ कारभाराची प्रचिती आली आहे. एका प्रकरणात नागपूर विभागीय अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २९ मे १९९९ रोजी भंडारा येथील विद्यार्थी नूपेंद्र यादवराव  नंदनवारचा हलबा अनुसूचित जमातीचा दावा फेटाळला होता.  याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ‘व्हिजिलन्स सेल’ने  चौकशी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आई-वडील व जवळच्या नातेवाईकांचे बयाण नोंदविले नाही. तसेच सेलमध्ये संशोधन  अधिकार्‍याचा समावेश नव्हता, असे त्याचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात प्रकरणातील तथ्य पडताळल्यानंतर याचिका अंशत: स्वीकारून समितीचा निर्णय रद्द केला आणि प्रकरण नव्याने  चौकशी करण्यासाठी समितीकडे परत पाठविले. याचिकाकर्ता समितीपुढे उपस्थित झाल्यानंतर एक वर्षात दावा निकाली काढण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. नागपूर येथील रमेश हिरामण  कोहाड, राजेंद्रकुमार रेखाराम बोकडे, उमरेड येथील सीता ज्ञानदेव पौनीकर आदींच्या समान विषयावरील याचिकाही न्यायालयाने समान आदेशान्वये  निकाली काढल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशजातीच्या दाव्याचा तपास करण्यासाठी प्रत्येक संचालनालयाने वरिष्ठ पोलीस उपअधीक्षकाच्या नेतृत्वाखाली ‘व्हिजिलन्स सेल’ स्थापन करावा.  सेलमध्ये आवश्यक संख्येत पोलीस निरीक्षक असावेत. पोलीस निरीक्षकाने अर्जदाराच्या रहिवासी भागात जावे. व्हिजिलन्स अधिकार्‍याने अर्जदाराच्या  दाव्याची व्यक्तिश: पडताळणी करावी. आवश्यक तथ्य गोळा करावे. शाळेचा अभिलेख, जन्म नोंदणी इत्यादी बाबी तपासाव्यात. उमेदवाराचे  आई-वडील, पालक, नातेवाईक किंवा अर्जदाराच्या सामाजिक दर्जाची माहिती असलेल्या अन्य व्यक्तीचे बयाण नोंदवावे. यानंतर संचालनालयात  अहवाल सादर करावा. याशिवायही विविध प्रकारचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.