शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दायमांची याचिका कोर्टाने फेटाळली

By admin | Updated: October 19, 2016 04:45 IST

अध्यक्षपदावरून मुदतीआधीच दूर करण्याच्या राज्यपालांच्या आदेशास आव्हान देणारी चंद्रकांत गोपीकिशन दायमा यांनी केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

मुंबई: महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुदतीआधीच दूर करण्याच्या राज्यपालांच्या आदेशास आव्हान देणारी चंद्रकांत गोपीकिशन दायमा यांनी केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.काँग्रेस नेते असलेल्या दायमा यांना आधीच्या आघाडी सरकारने आॅगस्ट २०१४ मध्ये तीन वर्षांसाठी यंत्रमाग महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमले होते. मात्र, निवडणुकीनंतर भाजपाचे सरकार सत्तेवर येताच डिसेंबर २०१५ मध्ये राज्यपालांनी दायमा यांना पदावरून दूर करण्याचा आदेश काढला.ठरावीक काळासाठी नेमणूक झाली असली, तरी राज्यपाल महामंडळाच्या अध्यक्षांसह कोणाही संचालकास आपल्या स्वेच्छाधिकारांत केव्ही पदावरून दूर करू शकतील, अशी तरतूद महामंडळाच्या ‘आर्टिकल्स आॅफ असोसिएशन’मध्ये आहे. दायमा अध्यक्ष म्हणून अपेक्षित असलेली कर्तव्ये पार पाडत नसल्याने महामंडळाचे नुकसान होत आहे, असा व्यवस्थापकीय संचालकांनी पाठविलेला अहवाल विचारात घेऊन राज्यपालांनी हा आदेश काढला होता.दायमा यांनी यास आव्हान देताना असा मुद्दा मांडला की, राज्यपालांनी ज्या तक्रारीच्या आधारे हा निर्णय घेतला ती खोटी होती. त्यामुळे राज्यपालांचा निर्णय मनमानी ठरतो. या संदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बी. पी. सिंघल वि. भारत सरकार या प्रकरणातील सन २०१० मधील निकालाचाही आधार घेतला होता.मात्र, ही याचिका फेटाळताना न्या. अनुप व्ही. मोहता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले की, राज्यपालांनी शहानिशा करून तथ्य दिसल्यावरच हा निर्णय घेतला आहे. शिवाय त्यांनी आपल्या आदेशात या निर्णयाची सविस्तर कारणे दिली आहेतखंडपीठाने म्हटले की, राज्यपालांनी सरकारी महामंडळाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला असल्याने तो व्यापक लोकहिताचाही ठरतो. आम्हाला त्यात काही गैर दिसत नाही.शिवाय बी. पी. सिंघल प्रकरणातील निकालाचा संदर्भ प्रस्तूत प्रकरणात गैरलागू ठरतो कारण तो विषय राज्यपाल या घटनात्मक हदावरील नियुक्तीशी संबंधित होता. तसेच राज्य चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या संचालकपदावरून ज्ञानेश्वर कांबळे यांना काढून टाकण्याचा राज्यपालांचा निर्णय रद्द करणारा याच उच्च न्यायालयाने दिलेला निकालही येथे लागू होता नाही. कारण तो निकाल राज्यपालांनी त्यांच्या निर्णयास कोणतीही सयुक्तिक कारणे न दिल्याने दिला गेला होता. (विशेष प्रतिनिधी)>दायमांच्या बडतर्फीची कारणेदायमा यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी राज्यपालांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविला होता. त्या अहवालात खालील बाबी प्रामुख्याने नमूद करण्यात आल्या होत्या-महामंडळाच्या बैठका घेतल्या नाहीत.विभागीय कार्यालयांना भेटी न दिल्याने काम विस्कळीत झाले.विविध सरकारी खात्यांकडून त्यांना हव्या असलेल्या कापडाच्या आॅर्डर न मिळविल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले.