शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात फेरमतदानाची मागणी कोर्टाने फेटाळली

By admin | Updated: May 13, 2014 03:59 IST

मतदार यादीतून नाव गायब झाल्याने मतदान करता न आलेल्या मुंबई व पुण्यातील नागरिकांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संसदेतील भाषणाचा दाखला देत न्यायालयाचे दार ठोठावले़

 मुंबई : मतदार यादीतून नाव गायब झाल्याने मतदान करता न आलेल्या मुंबई व पुण्यातील नागरिकांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संसदेतील भाषणाचा दाखला देत न्यायालयाचे दार ठोठावले़ पण या नागरिकांना डॉ़ आंबेडकरांच्या या भाषणाचा अर्थच कळला नाही़ मुळात डॉ़ आंबेडकर यांनी सुस्त न राहता दक्ष राहण्याचा सल्ला दिला होता, याची आठवण करून उच्च न्यायालयाने मुंबई व पुण्यातील काही ठिकाणी लोकसभेसाठी पुन्हा मतदान घेण्याची मागणी फेटाळून लावली़ गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीतून नावे गायब झालेल्या मुंबई व पुण्यातील काही नागरिकांनी ही याचिका केली आहे़ त्यात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर व त्यांची पत्नी यांचाही समावेश आहे़ तर प्रताप गायकवाड यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली असून, अग्नी या सामाजिक संघटनेने या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे़ या सर्व याचिकाकर्त्यांनी मतदान यादीतून नावे गायब झालेल्याला सर्वस्वी निवडणूक अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला. केवळ या मागणीवरचा निकाल न्यायालयाने सोमवारी जाहीर केला़ त्यात न्या़ अभय ओक व न्या़ एम़एस़ सोनक यांच्या खंडपीठाने अभिनेते पालेकरांसह सर्व याचिकाकर्त्यांचा समाचार घेतला़ न्यायालय म्हणाले, प्रत्यक्षात मात्र मतदार यादीचा मसुदा २०१३मध्ये प्रसिद्ध झाला व याची अंतिम यादी ३१ जानेवारी २०१४मध्ये जाहीर झाली़ आपले नाव यादीत नसल्याची खातरजमा केल्याचे उदाहरण देता आले नाही़ विशेष म्हणजे अमोल पालेकर यांचा राहण्याचा पत्ता मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील असून, त्यांनी तक्रार पुण्यात केली.