शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

पुण्यात फेरमतदानाची मागणी कोर्टाने फेटाळली

By admin | Updated: May 13, 2014 03:59 IST

मतदार यादीतून नाव गायब झाल्याने मतदान करता न आलेल्या मुंबई व पुण्यातील नागरिकांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संसदेतील भाषणाचा दाखला देत न्यायालयाचे दार ठोठावले़

 मुंबई : मतदार यादीतून नाव गायब झाल्याने मतदान करता न आलेल्या मुंबई व पुण्यातील नागरिकांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संसदेतील भाषणाचा दाखला देत न्यायालयाचे दार ठोठावले़ पण या नागरिकांना डॉ़ आंबेडकरांच्या या भाषणाचा अर्थच कळला नाही़ मुळात डॉ़ आंबेडकर यांनी सुस्त न राहता दक्ष राहण्याचा सल्ला दिला होता, याची आठवण करून उच्च न्यायालयाने मुंबई व पुण्यातील काही ठिकाणी लोकसभेसाठी पुन्हा मतदान घेण्याची मागणी फेटाळून लावली़ गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीतून नावे गायब झालेल्या मुंबई व पुण्यातील काही नागरिकांनी ही याचिका केली आहे़ त्यात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर व त्यांची पत्नी यांचाही समावेश आहे़ तर प्रताप गायकवाड यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली असून, अग्नी या सामाजिक संघटनेने या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे़ या सर्व याचिकाकर्त्यांनी मतदान यादीतून नावे गायब झालेल्याला सर्वस्वी निवडणूक अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला. केवळ या मागणीवरचा निकाल न्यायालयाने सोमवारी जाहीर केला़ त्यात न्या़ अभय ओक व न्या़ एम़एस़ सोनक यांच्या खंडपीठाने अभिनेते पालेकरांसह सर्व याचिकाकर्त्यांचा समाचार घेतला़ न्यायालय म्हणाले, प्रत्यक्षात मात्र मतदार यादीचा मसुदा २०१३मध्ये प्रसिद्ध झाला व याची अंतिम यादी ३१ जानेवारी २०१४मध्ये जाहीर झाली़ आपले नाव यादीत नसल्याची खातरजमा केल्याचे उदाहरण देता आले नाही़ विशेष म्हणजे अमोल पालेकर यांचा राहण्याचा पत्ता मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील असून, त्यांनी तक्रार पुण्यात केली.