शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

पुण्यात फेरमतदानाची मागणी कोर्टाने फेटाळली

By admin | Updated: May 13, 2014 03:59 IST

मतदार यादीतून नाव गायब झाल्याने मतदान करता न आलेल्या मुंबई व पुण्यातील नागरिकांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संसदेतील भाषणाचा दाखला देत न्यायालयाचे दार ठोठावले़

 मुंबई : मतदार यादीतून नाव गायब झाल्याने मतदान करता न आलेल्या मुंबई व पुण्यातील नागरिकांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संसदेतील भाषणाचा दाखला देत न्यायालयाचे दार ठोठावले़ पण या नागरिकांना डॉ़ आंबेडकरांच्या या भाषणाचा अर्थच कळला नाही़ मुळात डॉ़ आंबेडकर यांनी सुस्त न राहता दक्ष राहण्याचा सल्ला दिला होता, याची आठवण करून उच्च न्यायालयाने मुंबई व पुण्यातील काही ठिकाणी लोकसभेसाठी पुन्हा मतदान घेण्याची मागणी फेटाळून लावली़ गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीतून नावे गायब झालेल्या मुंबई व पुण्यातील काही नागरिकांनी ही याचिका केली आहे़ त्यात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर व त्यांची पत्नी यांचाही समावेश आहे़ तर प्रताप गायकवाड यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली असून, अग्नी या सामाजिक संघटनेने या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे़ या सर्व याचिकाकर्त्यांनी मतदान यादीतून नावे गायब झालेल्याला सर्वस्वी निवडणूक अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला. केवळ या मागणीवरचा निकाल न्यायालयाने सोमवारी जाहीर केला़ त्यात न्या़ अभय ओक व न्या़ एम़एस़ सोनक यांच्या खंडपीठाने अभिनेते पालेकरांसह सर्व याचिकाकर्त्यांचा समाचार घेतला़ न्यायालय म्हणाले, प्रत्यक्षात मात्र मतदार यादीचा मसुदा २०१३मध्ये प्रसिद्ध झाला व याची अंतिम यादी ३१ जानेवारी २०१४मध्ये जाहीर झाली़ आपले नाव यादीत नसल्याची खातरजमा केल्याचे उदाहरण देता आले नाही़ विशेष म्हणजे अमोल पालेकर यांचा राहण्याचा पत्ता मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील असून, त्यांनी तक्रार पुण्यात केली.