शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

रस्ता रुंदीकरणावरून कोर्टाने फटकारले

By admin | Updated: April 27, 2016 02:36 IST

परळ येथील एस. एस. राव रस्त्याचे रुंदीकरण करण्यास, मुंबई महापालिकेने तब्बल ११ वर्षे विलंब केल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेला चांगलेच फटकारले

मुंबई: परळ येथील एस. एस. राव रस्त्याचे रुंदीकरण करण्यास, मुंबई महापालिकेने तब्बल ११ वर्षे विलंब केल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेला चांगलेच फटकारले. मुंबईतील जागा सहजासहजी कोण सोडणार, असा सवाल करत मुंबई महापालिका आयुक्तांना जागा संपादित करण्यासाठी कायद्यात नमूद करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करा, असा खोचक सल्ला दिला.परळ येथील एस. एस. राव रोड जेमतेम २० फूट असून, या रस्त्याचे रुंदीकरण ४० फुटांपर्यंत करण्याचा निर्णय महापालिकेने २००५ मध्ये घेतला. मात्र, या निर्णयावर अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने, मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्दर्शक किरण शांताराम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.मंगळवारच्या सुनावणीत महापालिकेच्या वकिलांनी रस्ता रुंदीकरणासाठी एमजीएम रुग्णालायची वसाहत आणि बेस्ट कॉलनी जागा सोडण्यास तयार नाही आणि त्यांच्यावर जबरदस्ती करता येऊ शकत नाही, अशी माहिती खंडपीठाला दिली.‘सहजासहजी मुंबईत तुम्हाला कोण जागा देणार आहे, त्यामुळे कायद्याने तुम्हाला दिलेले अधिकार वापरा, पण तुम्ही असहाय्य असल्याचे सांगू नका,’ अशा शब्दांत खंडपीठाने महापालिकेची कान उघडणी केली. आतापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी काय पावले उचलली आणि रुंदीकरण केव्हापर्यंत होणार, याची माहिती जूनच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेला द्यायला सांगितली आहे, तसेच बेस्टलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी) >जनहितासाठी आवश्यकयाचिकेनुसार, एस. एस. रोड येथून कमलाकर गल्लीत जाण्यासाठी रस्ता अत्यंत अरुंद आहे. एखाद्या इमारतीला आग लागली किंवा एखाद्याला रुग्णवाहिकेतून नेण्याची आवश्यकता भासल्यास आपत्कालीन वाहन आत येणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो. ‘येथे आता मेगा सिटी उभारण्यात येत आहे. त्यामुळे जनहितासाठी हा रस्ता रुंद करणे भाग आहे. महापालिकेने त्या दृष्टीने पावले उचलावीत,’ असेही खंडपीठाने म्हटले.