शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

बांधकामे नियमित करण्यावर कोर्टाचे प्रश्नचिन्ह

By admin | Updated: April 27, 2016 06:31 IST

राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या प्रस्तावित धोरणावर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले

मुंबई : राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या प्रस्तावित धोरणावर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, राज्य सरकारने हे धोरण आखण्यापूर्वी ‘इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी’ केला का? शहरांच्या नागरी सुविधांवर याचा किती परिणाम होईल, याचा विचार सरकारने केला का? असे सवाल करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. नवी मुंबईतील दिघा, पिंपरी-चिचवड, कल्याण-डोंबिवली इत्यादी ठिकाणांतील बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वेगवगेळ्या जनहित याचिकांच्या निकालाद्वारे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दिघा बेकायदा बांधकामप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर, उच्च न्यायालयाने राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण आखण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला काही महिन्यांपूर्वी दिली. त्या वेळी उच्च न्यायालयाने हे धोरण न्यायालयाच्या परवानगीनेच अंतिम करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, राज्य सरकारने राज्यातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंदर्भात धोरण आखले. हे धोरण न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आले. (प्रतिनिधी) घटनेशी विसंगत धोरणहे प्रस्तावित धोरण घटनेच्या अनुच्छेद १४ शी विसंगत असून, सरकारने सरसकट सगळ्यांनाच अभय दिले आहे. बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी सरकार आरक्षित भूखंडाचे आरक्षणही हलवत आहे. सरकारचे हे धोरण एमआरटीपी कायद्याविरुद्ध आहे आणि न्यायालय ते कदापि सहन करू शकत नाही. - उच्च न्यायालयझोपडपट्ट्या नियमित करण्याचा निर्णय घेतला कसा?च्उच्च न्यायालयाने सरकारने या धोरणाद्वारे बेकायदा झोपडपट्ट्यांनाही नियमित करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारची खरडपट्टी काढली. ‘याच न्यायालयाने २००० पर्यंतच्या बेकायदा झोपडपट्ट्या नियमित करण्याची सरकारची विनंती मान्य केली होती. मात्र, यापुढे मुदत वाढवायची असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले होते. मग तुम्ही २०१५ पर्यंतच्या झोपडपट्ट्या नियमित करण्याचा निर्णय घेतला कसा?’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने सरकारच्या धोरणासंदर्भातील निकाल बुधवारपर्यंत राखून ठेवला.