शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

युतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात

By admin | Updated: January 22, 2017 20:34 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा- सेना युतीच्या निर्णयावर अद्यापही शिक्कामोर्तब झालं नाही.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा- सेना युतीच्या निर्णयावर अद्यापही शिक्कामोर्तब झालं नाही. याआधीही युतीसंदर्भात भाजपा आणि सेना नेत्यांदरम्यान तीन बैठक झाल्या. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. उलट भाजपा आणि सेना नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करणं सुरूच ठेवले आहे. भाजपाने शिवसेनेला 50-50चा फॉर्म्युला दिला होता. मात्र तो फेटाळत शिवसेनेनं भाजपाला 60 जागांचा प्रस्ताव दिला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. त्यासंदर्भातच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपा नेत्यांची जवळपास 4 तास आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई भाजपाच्या निवडणूक समिती, आमदार आणि खासदार यांच्याकडून संघटन आणि निवडणूक कामाचा आढावा घेतला. बैठकीत 227 जागांचा वॉर्डनिहाय, बुथनिहाय आढावा घेण्यात आला असून, भाजपाचा जाहीरनामा, उमेदवार, पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील पदाधिकाऱ्यांची रात्री 9 वाजता पुन्हा बैठक होत आहे. युतीबाबत भाजपा आश्वासक असून याबाबत पुढील निर्णय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेतील, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत. आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहेत. मात्र अद्याप दोन्ही पक्षांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय, याबाबतही जनतेच्या मनात संभ्रम कायम आहे.