शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्यासाठी न्यायालयच आले खाली

By admin | Updated: July 8, 2017 22:22 IST

महालोकअदालतीमध्ये अपंग असलेल्या ज्येष्ठ महिलेला न्याय देण्यासाठी न्यायालयच दोन मजले उतरून खाली आले

ऑनलाइन लोकमत
 
अपंग महिला : महालोकअदालतीत मिळाला न्याय  
 
पुणे, दि. 8 - न्याय मिळविण्यासाठी एरवी पक्षकारांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. मात्र, महालोकअदालतीमध्ये अपंग असलेल्या ज्येष्ठ महिलेला न्याय देण्यासाठी न्यायालयच दोन मजले उतरून खाली आले. तिचे म्हणणे ऐकून घेऊन तिलाही न्यायही दिला. न्यायालयाची एक वेगळी बाजू शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये पक्षकारांना पाहायला मिळाली. 
 
हौसाबाई छबू पशाले (वय ६०, रा. आढळे खुर्द, ता. मावळ) असे न्याय मिळालेल्या त्या महिलेचे नाव आहे. हौसाबाई ११ मार्च २०१५ रोजी नातेवाईकाच्या लग्नासाठी कारमधून कुटुंबियांसोबत निघाल्या होत्या. त्यावेळी समोरून येणाºया इनोव्हा गाडीने त्या कारला धडक दिली. त्यामध्ये हौसाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मणख्याला दुखापत झाली. उपचारावर मोठा खर्च केला. तरीही त्यांना चालता येत नव्हते. नीट बसता येत नव्हते. त्यांनी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी अ‍ॅड. तुषार पाचपुते यांच्यामार्फत १७ जून २०१५ रोजी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.  मात्र, अपंगत्वामुळे हौसाबाई यांना न्यायालयात हजर राहणे शक्य नव्हते. याबाबतची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला देण्यात आली होती. शनिवारी महालोकअदालतमध्ये कारमधून हौसाबाई यांना शिवाजीनगर न्यायालयातील नवीन इमारतीच्या समोर हजर करण्यात आले. त्यावेळी दुसºया मजल्यावर त्यांना नेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी पॅनेलचे सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी, हर्षदा वैद्य, प्राजक्ता कुलकर्णी दुसºया मजल्यावरून खाली उतरून नवीन इमारतीच्या पुढे आले. हौसाबाई यांचे म्हणणे जाणून घेतले. तडजोडीअंती त्यांना ६ लाख ५० हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. त्यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.आर.अष्टुरकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ राजेंद्र दौंडकर, विशेष न्यायाधीश एम.डब्ल्यू. चांदवाणी, विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात, न्यायमूर्ती एस.एच. ग्वालानी, न्यायमूर्ती ए. एस. महात्मे, न्यायमूर्ती जहागिरदार, अर्जदाराचे वकील तुषार पाचपुते, अ‍ॅड. मयुर खांडरे, रिलायन्स कंपनीकडून अ‍ॅड. हृर्षिकेश गानू उपस्थित होते. हा खटला तडजोडीने लवकरात लवकर सुटावा, यासाठी रिलायन्स कंपनीनेही पुढाकार घेतला होता. कंपनीचे अधिकारी जून महिन्यात मुंबई येथून पुणे येथे आले होते, असे अ‍ॅड़ गानू यांनी सांगितले.