शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

देशात विभाजनाचे राजकारण सुरू

By admin | Updated: May 5, 2015 01:36 IST

: देशात धार्मिक विभाजनाचे राजकारण सुरू आहे. त्यासाठी धार्मिक कट्टरतेला खतपाणी घातले जात आहे. एका धर्माकडून आक्रमक भूमिका मांडली

मुंबई : देशात धार्मिक विभाजनाचे राजकारण सुरू आहे. त्यासाठी धार्मिक कट्टरतेला खतपाणी घातले जात आहे. एका धर्माकडून आक्रमक भूमिका मांडली की दुसऱ्या धर्माच्या नागरिकांचे आपसूकच धृवीकरण होईल, अशी खेळी भाजपा, शिवसेना आणि संघाशी संबंधित संघटनांकडून सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकर्ता बैठकीत चव्हाण बोलत होते. या वेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, मुस्लिमांचा मताधिकार काढून टाका, हिंदूंनी ५ -१० मुले जन्माला घालावी, अशी विधाने एका सुनियोजित कटाचा भाग आहे. देशातील सर्वसमावेशक विचारधारा कायम असेपर्यंत आपल्याला निरंकुश सत्ता मिळणार नाही याची जाणीव भाजपा-सेनेला आहे. त्यामुळेच देशातील धर्मनिरपेक्ष विचारधारेवर घाला घालण्याचे काम सुरू आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. धार्मिक संशयाचे वातावरण तयार करण्यासाठी सोशल मीडियातून खोटा व चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. तरुणांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न सुरू आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी संघविचारांची मंडळी घुसवली जात आहेत. भाजपा-सेनेचा हा डाव उधळून लावण्यासाठी सर्वसमावेशक व सर्वव्यापक विचारधारा अधिक मजबूत करावी लागणार असल्याचे चव्हाण यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)