शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

परदेशात देशाची नालस्ती अयोग्यच

By admin | Updated: June 11, 2016 04:00 IST

पतंप्रधान परदेश दौऱ्यावर कोणत्या पक्षाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करीत असतात; मात्र नरेंद्र मोदी यांना याचे भान राहिलेले दिसत नाही. ते जेव्हा परदेशात जातात, तेव्हा देशाची आणि काँग्रेस

मुंबई : पतंप्रधान परदेश दौऱ्यावर कोणत्या पक्षाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करीत असतात; मात्र नरेंद्र मोदी यांना याचे भान राहिलेले दिसत नाही. ते जेव्हा परदेशात जातात, तेव्हा देशाची आणि काँग्रेस पक्षाची निंदानालस्ती करीत असतात. हे योग्य नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मोदींना सुनावले. राष्ट्रवादीचा १७ वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. ‘सोळावं वरीस धोक्याचं’ म्हणतात, पण आपल्या पक्षाचा आज १७ वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे धोक्याचं सोळावं वरीस संपलेलं आहे, अशी मिश्कील सुरुवात करून पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की केंद्र सरकार जाहिरातबाजी करीत सुटले आहे. पण दोन वर्षांत कृषी उत्पन्नात घट झाली, औद्योगिक उत्पादन घटले, बेरोजगारांची संख्या वाढली. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मराठवाडा होरपळताना, रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आलेली असताना भाजपावाले त्यांचेच कौतुक करून घेत आहेत, हे योग्य नाही, असा टोला पवार यांनी लगावला. बराक ओबामा यांची कारकीर्द संपत आली आहे. गळाभेट घेण्यापलीकडे त्यांना काही काम उरलेले नाही. मोदींनी त्यांची भेट घेऊन काय मिळविले, असा सवालही त्यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारने आकसाने आपल्या नेत्यांना तुरुंगात टाकले, असे विधान पवारांनी छगन भुजबळ यांचा नामोल्लेख टाळून केले. कल्याण-डोंबविली पालिका निवडणुकीत उद्धव यांनी सरकारची लायकी काढली होती. त्याची आठवण करून देत उद्धव यांनी आता लायकी असणाऱ्यांसोबत राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. मोदींनी परदेशात जाऊन जैतापूरसाठी करार केले. त्यामुळे आता विजेच्या बदल्यात अमेरिकी लोकांना आपल्या देशात नोकऱ्या मिळतील. त्यामुळे जैतापूरला प्रकल्प होऊ देणार नाही म्हणणारी शिवसेना आता गप्प का, असा सवाल पवार यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)जिल्ह्यांचे वाटपआगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी यांच्याकडे अमरावती, जीवनराव गोरे यांच्याकडे लातूर, आ. जितेंद्र आव्हाड नाशिक तर शशिकांत शिंदे यांच्याकडे वर्धा जिल्ह्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.