शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

देशाचे अर्थकारण संकटाच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: March 19, 2017 01:16 IST

नोटाबंदीमुळे काहीही झाले नाही असे भासवले जात असले तरी देशाचे अर्थकारण एक प्रकारच्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे, असे जाणकारांचे मत आहे. सहकार क्षेत्राकडे पाहण्याच्या

पुणे : नोटाबंदीमुळे काहीही झाले नाही असे भासवले जात असले तरी देशाचे अर्थकारण एक प्रकारच्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे, असे जाणकारांचे मत आहे. सहकार क्षेत्राकडे पाहण्याच्या या सरकारच्या दृष्टिकोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कमजोर झाली असून त्याचा परिणाम स्वाभाविकच उद्योग व अन्य क्षेत्रावर होत आहे, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर असोसिएशनच्या (एमसीसीआय) वतीने पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्धल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित उद्योजकांशी संवाद साधताना पवार बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, माजी अध्यक्ष रवी पंडित, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरूवातीला पंडित, राहूल राठी व प्रशांत आजमवालयीस यांनी उद्योगक्षेत्रातील त्यांचे अनुभव कथन केले. त्यापैकी पंडित यांनी नोटाबंदीचा फायदाही झाल्याचे सांगितले.त्याचाच संदर्भ घेत पवार म्हणाले, ‘‘सहकार क्षेत्रातील बँकांना केंद्र सरकारने नोटा बदलून देण्यासाठी मनाई केली. एकट्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेत तब्बल ५८० कोटी रूपये पडून आहेत. देशात साधारण ८ हजार कोटी रूपये आहेत. पंतप्रधानांनी सांगितले की ३१ मार्च नंतर या नोटांना कागदाइतकीच किंमत आहे. प्रत्येक खात्याची तपासणी केल्यानंतरच पैसे अदा करण्यात येईल, असे आरबीआयने सांगितले होते. त्याप्रमाणे तपासणी झाली, मात्र तरीही नोटा बदलून दिल्या जात नाहीत.ग्रामीण भागाचे सगळे अर्थकारण या बँकांवरच अवलंबून आहे. आजची स्थिती अशी आहे की, उसाचे पैसे बँकांमध्ये खात्यात जमा आहेत मात्र ते काढताच येत नाहीत. अशा वेळी शेतकरी किंवा ग्रामीण भागातील नागरिकांची खर्च करण्याची क्षमता कमी होते. त्याचा परिणाम उद्योगांवर होतो. आणखी काही दिवस स्थिती अशीच राहिली तर मंदी येणार असे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत, असे पवार म्हणाले. सुरूवातीला एमसीसीआय ने स्थापन केलेल्या फोरम आॅफ असोसिएशन्स या नव्या संघटनेचे उद््घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी) शेतमालाची आयात नको कोणताही कर न लावता परदेशातून गहू, सोयाबीन आणि डाळींची आयात करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार आहे. हा सवलतीचा निर्णय देशातील शेती व शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. आपल्या गरजेपुरते उत्पन्न शेतकरी घेत असून बाहेरच्या लोकांना सवलत देण्यापेक्षा त्यांना निर्यातीसाठी सवलत द्यायला हवी, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय डाळिंब परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डाळिंब रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.‘मएसो’तर्फेही सत्कारमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे (मएसो )शरद पवार यांना पद्मविभूषण हा नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल तसेच अमर साबळे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.