शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा !

By admin | Updated: October 23, 2015 04:18 IST

देशाची मान शाई टाकण्यामुळे नाही, तर दादरी हत्याकांडामुळे खाली गेली, असा टोला भाजपाला लगावतानाच गोमांसाची आवई उठवण्यापेक्षा देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा आणि समान नागरी

उद्धव यांचे मोदींना आव्हान : गाईवर नव्हे महागाईवर चर्चा करामुंबई : देशाची मान शाई टाकण्यामुळे नाही, तर दादरी हत्याकांडामुळे खाली गेली, असा टोला भाजपाला लगावतानाच गोमांसाची आवई उठवण्यापेक्षा देशाला हिंदू राष्ट्र जाहीर करा आणि समान नागरी कायदा लागू करा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी ललकारले.शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. त्या वेळी ठाकरे यांनी हिंदुत्व व महागाई या दोन प्रमुख मुद्द्यांवरून केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरले. मात्र कुठल्याही परिस्थितीत सत्ता सोडणार नाही, असेही स्पष्ट केले. गाईवर नव्हे, तर महागाईवर चर्चा करा. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे कसे स्थिर ठेवले होते. मग आताच ते का जमत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. सत्तेत असताना महागाईवर लक्ष नसेल तर मी जनतेला तोंड दाखवू शकत नाही. इतका निर्लज्ज मी नाही. शिवसेना पाकिस्तानबद्दल बोलली तर भाजपाच्या पोटात का दुखते, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. गर्वसे कहो हम हिंदू है, असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे आणि देवळातील घंटा बडवण्याचे नाही तर अतिरेक्यांना बडवणारे आहे, असा चिमटा ठाकरे यांनी संघ परिवाराला घेतला. ‘मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे’ अशा शब्दांत भाजपाच्या फसलेल्या राम मंदिर आंदोलनाचा समाचार घेताना रामाने लंकेत घुसून जसा रावणाचा मुडदा पाडला तसा पाकचा पाडा, असा सल्ला त्यांनी दिला. मुफ्ती महंमद सईद जर तुम्हाला चालत असतील तर शिवसेनेचेही थोडे ऐका, असा टोलाही त्यांनी लगावला. मला वाद नको आहे. देशातील सरकार ही जनतेची शेवटची आशा आहे. ते सरकार नालायक ठरले तर देशाची काय अवस्था होईल ते मला माहित नाही, असे सांगत ठाकरे म्हणाले की, आम्ही टीका केली की लागलीच सत्तेतून कधी बाहेर पडणार हे विचारले जाते. सगळे चांगले झाले की आम्ही सत्तेतून बाहेर पडू. सत्तेत किती काळ राहायचे ते आम्हाला चांगले कळते. मात्र हे बजावत असतानाच ठाकरे यांनी विधानसभेवर भगवा फडकवून दाखवीन असेही जाहीर केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पाकिस्तानी कलाकार व क्रिकेटपटू यांना संरक्षण देण्याची जी भाषा केली त्याची खिल्ली उडवताना वेदात काय म्हटले आहे ते तुम्ही सांगा, पण आम्ही वेडात धावणारे मराठे आहोत, असे मत व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी)...तर इंदू मिलचे भूमिपूजन कशाला केले?हरियाणात भाजपाची सत्ता असतानाही दलित हत्याकांड घडले. त्यावर बोलताना केंद्रीयमंत्री व्ही. के. सिंग यांनी दलितांची तुलना कुत्र्याशी केली. दलितांबद्दल तुमच्या या भावना आहेत तर इंदू मिलचे भूमिपूजन कशाला केले? असली ढोंगं कशाला करता, असा सवाल ठाकरे यांनी केला.शरद पवारांनी स्वाभिमान शिकवू नयेशरद पवार यांचा समाचार घेताना शिवसेनाप्रमुख त्यांना काय म्हणायचे ते मी बोलू का, असा सवाल करीत मी सभ्यपणाच्या मर्यादा पाळतो. पण माझ्या तोंडून तो शब्द गेला तर बोलू नका, असे सांगत पवार यांनी स्वाभिमान शिकवू नये, असा टोला लगावला.