शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

‘झिंगाट’ गाण्याने देश घडत नाही

By admin | Updated: November 9, 2016 03:46 IST

आजकालची मुले ही झिंगाटसारख्या गाण्यांकडे वळत आहेत; परंतु अशाने देश घडत नाही, अशी टीका शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी केली.

ठाणे : आजकालची मुले ही झिंगाटसारख्या गाण्यांकडे वळत आहेत; परंतु अशाने देश घडत नाही, अशी टीका शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी केली. ठाण्यात शिवचरित्र विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. येथील राज्याभिषेक समारोह संस्थेने रविवारी श्रीराम व्यायामशाळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्डे म्हणाले की, हिंदुस्थानात धर्म संपवायला अनेक आक्रमणे येत आहेत. त्याविरुद्ध लढायचे असेल, सशक्त व बळकट व्हायचे असेल तर ती आक्रमणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ३५० वर्षांपूर्वी या हिंदुस्थानावर अनेक आक्रमणे आली तेव्हा शिवाजी महाराजांनी या आक्रमणांना तोंड देत ही हिंदू भूमी जिवंत ठेवली. किल्ले स्पर्धेत सहभागी झालेल्या ठाण्यातील मुलांचे कौतुक करीत कर्डे म्हणाले की, हल्ली किल्ल्यांची वाईट अवस्था झालेली आहे. बुरूज पडले आहेत, प्रवेशद्वार ढासळले आहेत, राजगादी नाही, दगडधोंड्याशिवाय तेथे काही नाही. पुढील दहा वर्षांत किल्ल्यांची काय अवस्था होईल हे सांगता येत नाही. आमची संस्कृती, धर्म जिवंत राहिला हे त्या पडलेल्या किल्ल्यांचे महत्त्व आहे. किल्ले भरवणाऱ्या मंडळांमुळे आणि या मंडळांतील सुसंस्कृत लोकांमुळे आज देश टिकला आहे. आदिवासी पाड्यांत धर्मांतर करून हजारो आदिवासी बाटवले जातात. आमच्या धर्मावर येणारी आक्रमणं कोण करते हे सांगितले पाहिजे. पैसे देऊन आदीवासींना बाटवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. किल्ले आता पिकनिक स्पॉट झाले आहे अशी खंत व्यक्त करीत ते म्हणाले की, आपले किल्ले हे शौर्याची हकिकत असून त्यांना आजच्या या तरुणांनी भेट द्यावी आणि त्या किल्ल्यांची माती कपाळाला लावावी. सणासुदीला बाहेर जाऊन, नको त्यापेक्षा किल्ले बनवून आपला इतिहास जागृत ठेवण्याचे काम ही मुले करीत आहेत, अशा शब्दांत ठाणेकरांचे त्यांनी कौतुक केले.