शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘झिंगाट’ गाण्याने देश घडत नाही

By admin | Updated: November 9, 2016 03:46 IST

आजकालची मुले ही झिंगाटसारख्या गाण्यांकडे वळत आहेत; परंतु अशाने देश घडत नाही, अशी टीका शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी केली.

ठाणे : आजकालची मुले ही झिंगाटसारख्या गाण्यांकडे वळत आहेत; परंतु अशाने देश घडत नाही, अशी टीका शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी केली. ठाण्यात शिवचरित्र विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. येथील राज्याभिषेक समारोह संस्थेने रविवारी श्रीराम व्यायामशाळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्डे म्हणाले की, हिंदुस्थानात धर्म संपवायला अनेक आक्रमणे येत आहेत. त्याविरुद्ध लढायचे असेल, सशक्त व बळकट व्हायचे असेल तर ती आक्रमणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ३५० वर्षांपूर्वी या हिंदुस्थानावर अनेक आक्रमणे आली तेव्हा शिवाजी महाराजांनी या आक्रमणांना तोंड देत ही हिंदू भूमी जिवंत ठेवली. किल्ले स्पर्धेत सहभागी झालेल्या ठाण्यातील मुलांचे कौतुक करीत कर्डे म्हणाले की, हल्ली किल्ल्यांची वाईट अवस्था झालेली आहे. बुरूज पडले आहेत, प्रवेशद्वार ढासळले आहेत, राजगादी नाही, दगडधोंड्याशिवाय तेथे काही नाही. पुढील दहा वर्षांत किल्ल्यांची काय अवस्था होईल हे सांगता येत नाही. आमची संस्कृती, धर्म जिवंत राहिला हे त्या पडलेल्या किल्ल्यांचे महत्त्व आहे. किल्ले भरवणाऱ्या मंडळांमुळे आणि या मंडळांतील सुसंस्कृत लोकांमुळे आज देश टिकला आहे. आदिवासी पाड्यांत धर्मांतर करून हजारो आदिवासी बाटवले जातात. आमच्या धर्मावर येणारी आक्रमणं कोण करते हे सांगितले पाहिजे. पैसे देऊन आदीवासींना बाटवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. किल्ले आता पिकनिक स्पॉट झाले आहे अशी खंत व्यक्त करीत ते म्हणाले की, आपले किल्ले हे शौर्याची हकिकत असून त्यांना आजच्या या तरुणांनी भेट द्यावी आणि त्या किल्ल्यांची माती कपाळाला लावावी. सणासुदीला बाहेर जाऊन, नको त्यापेक्षा किल्ले बनवून आपला इतिहास जागृत ठेवण्याचे काम ही मुले करीत आहेत, अशा शब्दांत ठाणेकरांचे त्यांनी कौतुक केले.