शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

महाराष्ट्राच्या १४ गावांतील शेतजमिनीची तेलंगणाकडून मोजणी

By admin | Updated: April 28, 2016 22:53 IST

महाराष्ट्र -तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्राच्या अधिकार क्षेत्रातील १४ गावांमध्ये तेलंगणा सरकारने शेतजमीन मोजणी सुरू केली आहे. या गावांमधील अनुसूचित जमातीच्या

- संघरक्षित तावाडे, जिवती(चंद्रपूर)
 
महाराष्ट्र -तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्राच्या अधिकार क्षेत्रातील १४ गावांमध्ये तेलंगणा सरकारने शेतजमीन मोजणी सुरू केली आहे. या गावांमधील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना जमिनीचे पट्टे देण्यासाठी न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून तेलंगणा सरकार ही मोजणी करीत आहे.
ही १४ गावे वादग्रस्त म्हणून ओळखली जातात. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या १९९७ च्या निर्णयानुसार या गावातील नागरिक व शेतजमीन ही महाराष्ट्र  राज्याच्याच अखत्यारित येते.   तरीही सरकारचे या गावांकडे लक्ष नाही. या गावांना मिळणाºया सुविधांचा जर विचार केला तर महाराष्ट्र सरकारपेक्षा तेलंगणा सरकारच सोई- सुविधा देत असल्याचे येथील नागरिक सांगतात.
सीमेवरील या १४ गावांना जमिनीच्या पट्ट्यांचा प्रश्न नेहमीच सतावत आहे. आजपर्यंत अनेकवेळा महाराष्ट्र सरकारकडून जमिनीचे पट्टे मिळवून देऊ, असे आश्वासन देण्यात आले. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता या १४ गावातील अनुसूचित जमातीच्या लोकांच्या जमिनीची आठवडाभरापासून पट्टा देण्यासाठी मोजणी जोरात सुरु आहे. आंध्र प्रदेशची विभागणी करून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आहे. पूर्वी आंध्र राज्याच्या नावाने काही लोकांना पट्टे होते. ते जसेच्या तसे तेलंगणा राज्याच्या नावाने होणार असून ज्या लोकांना (अनुसूचित जमाती) पट्टे नव्हते, त्यांनासुद्धा तेलंगणा सरकार पट्टे देणार आहे. त्यासाठी तेलंगणा राज्याच्या अधिकाºयांनी येथे येऊन युद्धपातळीवर मोजणी सुरु केली आहे.
परमडोली ग्रा.पं.अंतर्गत महाराजगुडा या गावापासून शेतजमिनीची मोजणी या अधिकाºयांनी सुरु केली. महाराजगुडा हे गाव बंजारा समाजाचे असून महाराष्ट्रात या जातीचा प्रवर्ग आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती हा समाजगट आंध्र प्रदेशात किंवा तेलंगणा राज्यात अनुसूचित जमातीत आहे आणि यामुळे येथील प्रत्येक कुटुंबाला जमिनीचे पट्टे मिळणार आहेत. परमडोली गावातील मोजणी झाली की लगेच अंतापूर ग्रामपंचायतींतर्गत येणा-या गावांची मोजणी होणार आहे.
 
तेलंगणाच्या पट्ट्याचा असा आहे फायदा...
प्रस्तुत प्रतिनिधीने तेलंगणाच्या पट्ट्याचा फायदा मिळतो का, असे लोकांना विचारले असता या पट्ट्यामुळे नापिकी झाल्यास मदत मिळते. शेतीसाठी खत, बी-बियाणे, कर्ज मिळते. एवढेच नव्हे तर मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपयांची मदतही मिळते, असे येथील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
 
महाराष्ट्र सरकारने नेहमी येथील जमीन ही अतिक्रमणाखाली आहे, असे सांगत पट्टे दिले नाही. उलट तेलंगणा राज्याकडून याच पट्ट्यामुळे आम्हाला फायदा मिळतो आहे.
- विजय राठोड, ग्रामस्थ महाराजगुडा
 
सीमेवरील १४ गावे ही महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारित येतात. असे असताना तेलंगणा राज्यातील अधिकारी येथील जमिनीचे मोजमाप कसे काय करू शकतात? आता तरी महाराष्ट्र सरकारने जागे व्हायला पाहिजे.
- मधुकर रणवीर, सामाजिक कार्यकता, मुकदमगुडा