शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या १४ गावांतील शेतजमिनीची तेलंगणाकडून मोजणी

By admin | Updated: April 28, 2016 22:53 IST

महाराष्ट्र -तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्राच्या अधिकार क्षेत्रातील १४ गावांमध्ये तेलंगणा सरकारने शेतजमीन मोजणी सुरू केली आहे. या गावांमधील अनुसूचित जमातीच्या

- संघरक्षित तावाडे, जिवती(चंद्रपूर)
 
महाराष्ट्र -तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्राच्या अधिकार क्षेत्रातील १४ गावांमध्ये तेलंगणा सरकारने शेतजमीन मोजणी सुरू केली आहे. या गावांमधील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना जमिनीचे पट्टे देण्यासाठी न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून तेलंगणा सरकार ही मोजणी करीत आहे.
ही १४ गावे वादग्रस्त म्हणून ओळखली जातात. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या १९९७ च्या निर्णयानुसार या गावातील नागरिक व शेतजमीन ही महाराष्ट्र  राज्याच्याच अखत्यारित येते.   तरीही सरकारचे या गावांकडे लक्ष नाही. या गावांना मिळणाºया सुविधांचा जर विचार केला तर महाराष्ट्र सरकारपेक्षा तेलंगणा सरकारच सोई- सुविधा देत असल्याचे येथील नागरिक सांगतात.
सीमेवरील या १४ गावांना जमिनीच्या पट्ट्यांचा प्रश्न नेहमीच सतावत आहे. आजपर्यंत अनेकवेळा महाराष्ट्र सरकारकडून जमिनीचे पट्टे मिळवून देऊ, असे आश्वासन देण्यात आले. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता या १४ गावातील अनुसूचित जमातीच्या लोकांच्या जमिनीची आठवडाभरापासून पट्टा देण्यासाठी मोजणी जोरात सुरु आहे. आंध्र प्रदेशची विभागणी करून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आहे. पूर्वी आंध्र राज्याच्या नावाने काही लोकांना पट्टे होते. ते जसेच्या तसे तेलंगणा राज्याच्या नावाने होणार असून ज्या लोकांना (अनुसूचित जमाती) पट्टे नव्हते, त्यांनासुद्धा तेलंगणा सरकार पट्टे देणार आहे. त्यासाठी तेलंगणा राज्याच्या अधिकाºयांनी येथे येऊन युद्धपातळीवर मोजणी सुरु केली आहे.
परमडोली ग्रा.पं.अंतर्गत महाराजगुडा या गावापासून शेतजमिनीची मोजणी या अधिकाºयांनी सुरु केली. महाराजगुडा हे गाव बंजारा समाजाचे असून महाराष्ट्रात या जातीचा प्रवर्ग आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती हा समाजगट आंध्र प्रदेशात किंवा तेलंगणा राज्यात अनुसूचित जमातीत आहे आणि यामुळे येथील प्रत्येक कुटुंबाला जमिनीचे पट्टे मिळणार आहेत. परमडोली गावातील मोजणी झाली की लगेच अंतापूर ग्रामपंचायतींतर्गत येणा-या गावांची मोजणी होणार आहे.
 
तेलंगणाच्या पट्ट्याचा असा आहे फायदा...
प्रस्तुत प्रतिनिधीने तेलंगणाच्या पट्ट्याचा फायदा मिळतो का, असे लोकांना विचारले असता या पट्ट्यामुळे नापिकी झाल्यास मदत मिळते. शेतीसाठी खत, बी-बियाणे, कर्ज मिळते. एवढेच नव्हे तर मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपयांची मदतही मिळते, असे येथील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
 
महाराष्ट्र सरकारने नेहमी येथील जमीन ही अतिक्रमणाखाली आहे, असे सांगत पट्टे दिले नाही. उलट तेलंगणा राज्याकडून याच पट्ट्यामुळे आम्हाला फायदा मिळतो आहे.
- विजय राठोड, ग्रामस्थ महाराजगुडा
 
सीमेवरील १४ गावे ही महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारित येतात. असे असताना तेलंगणा राज्यातील अधिकारी येथील जमिनीचे मोजमाप कसे काय करू शकतात? आता तरी महाराष्ट्र सरकारने जागे व्हायला पाहिजे.
- मधुकर रणवीर, सामाजिक कार्यकता, मुकदमगुडा