शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार पोलिसांचा मोजणार भावनांक

By admin | Updated: May 6, 2015 03:51 IST

वाकोला गोळीबारासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस दलातल्या ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भावनांक किंवा भावनिक परिपक्वता तपासली जाणार आहे.

जयेश शिरसाट,  मुंबईवाकोला गोळीबारासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस दलातल्या ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भावनांक किंवा भावनिक परिपक्वता तपासली जाणार आहे. त्यानंतर गरजेनुसार मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशनही लाभणार आहे. या तपासणीत आयुक्त राकेश मारिया यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही भावनांकाचे विश्लेषण होणार आहे. भावनांक तपासण्याची ही कवायत सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. भारती यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार आयुक्तांपासून शेवटच्या पोलीस शिपायापर्यंत सर्वांकडून एक फॉर्म भरून घेतला जाईल. या फॉर्ममध्ये मानसोपचार तज्ज्ञांनी काढलेले प्रश्न असतील. या प्रश्नांच्या उत्तरांवरून प्रत्येकाचा भावनांक मोजला जाईल. त्यानंतर गरजेनुसार मानसोपचार तज्ज्ञ प्रत्येकाचे समुपदेशन करतील. तसेच भावनांवर नियंत्रण (पान ६ वर)मिळविण्यासाठीचे उपाय सुचवतील. मानसोपचारतज्ज्ञांच्या याच समितीकडून पोलिसांचा भावनांक मोजण्यासाठी आवश्यक असलेले प्रश्न ठरविणार आहे. त्यातून एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याच्या भावनांचा उद्रेक होतो का, त्याला भावना आवरता येत नाहीत का, भावनेच्या भरात तो हिंसक होतो आणि पुढलामागचा विचार न करता तो कृती करतो का, हे मानसोपचार तज्ज्ञ जाणून घेणार आहेत.मारिया यांनी पोलीस आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर त्यांनी अशाप्रकारे पोलिसांचा भावनांक मोजता येईल, असे सांगितले होते. त्यांची ती सूचना योजनेचे स्वरूप घेत असतानाच वाकोला प्रकरण घडल्याने या योजनेची अमलबजावणी तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.दरम्यान, मुंबई विद्यापिठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गौतम गवळी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पोलिसांच्या भावनांकासोबत भावनिक परिपक्वताही तपासणे आवश्यक आहे. दुसऱ्याने व्यक्त केलेल्या भावना समजून घेणे आणि स्वत:च्या भावना दुसऱ्याला समजतील अशा व्यक्त करणे याला इमोशनल इंटेलीजन्स किंवा भावनिक परिपक्वता म्हणतात. पोलिसांना कॉन्फ्लीक्ट मॅनेजमेन्टचे (संघर्ष परिस्थितीतील व्यवस्थापन) धडे देणे आवश्यक असल्याचे डॉ. गवळी सांगतात. पोलिसांच्या आयुष्यात दररोज मानसिक संघर्षाची परिस्थिती उद्भवते. शिवाय पोलीस सशस्त्र असतात. त्यामुळे भावनिक संतुलन बिघडल्यास वाकोला गोळीबारासारखे प्रकार घडू शकतात.उपाययोजना करण्यावर भरशारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस दलात भावनांक मोजून तो नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.- देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था)