शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

४० हजार पोलिसांचा मोजणार भावनांक

By admin | Updated: May 6, 2015 03:51 IST

वाकोला गोळीबारासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस दलातल्या ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भावनांक किंवा भावनिक परिपक्वता तपासली जाणार आहे.

जयेश शिरसाट,  मुंबईवाकोला गोळीबारासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस दलातल्या ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भावनांक किंवा भावनिक परिपक्वता तपासली जाणार आहे. त्यानंतर गरजेनुसार मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशनही लाभणार आहे. या तपासणीत आयुक्त राकेश मारिया यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही भावनांकाचे विश्लेषण होणार आहे. भावनांक तपासण्याची ही कवायत सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. भारती यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार आयुक्तांपासून शेवटच्या पोलीस शिपायापर्यंत सर्वांकडून एक फॉर्म भरून घेतला जाईल. या फॉर्ममध्ये मानसोपचार तज्ज्ञांनी काढलेले प्रश्न असतील. या प्रश्नांच्या उत्तरांवरून प्रत्येकाचा भावनांक मोजला जाईल. त्यानंतर गरजेनुसार मानसोपचार तज्ज्ञ प्रत्येकाचे समुपदेशन करतील. तसेच भावनांवर नियंत्रण (पान ६ वर)मिळविण्यासाठीचे उपाय सुचवतील. मानसोपचारतज्ज्ञांच्या याच समितीकडून पोलिसांचा भावनांक मोजण्यासाठी आवश्यक असलेले प्रश्न ठरविणार आहे. त्यातून एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याच्या भावनांचा उद्रेक होतो का, त्याला भावना आवरता येत नाहीत का, भावनेच्या भरात तो हिंसक होतो आणि पुढलामागचा विचार न करता तो कृती करतो का, हे मानसोपचार तज्ज्ञ जाणून घेणार आहेत.मारिया यांनी पोलीस आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर त्यांनी अशाप्रकारे पोलिसांचा भावनांक मोजता येईल, असे सांगितले होते. त्यांची ती सूचना योजनेचे स्वरूप घेत असतानाच वाकोला प्रकरण घडल्याने या योजनेची अमलबजावणी तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.दरम्यान, मुंबई विद्यापिठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गौतम गवळी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पोलिसांच्या भावनांकासोबत भावनिक परिपक्वताही तपासणे आवश्यक आहे. दुसऱ्याने व्यक्त केलेल्या भावना समजून घेणे आणि स्वत:च्या भावना दुसऱ्याला समजतील अशा व्यक्त करणे याला इमोशनल इंटेलीजन्स किंवा भावनिक परिपक्वता म्हणतात. पोलिसांना कॉन्फ्लीक्ट मॅनेजमेन्टचे (संघर्ष परिस्थितीतील व्यवस्थापन) धडे देणे आवश्यक असल्याचे डॉ. गवळी सांगतात. पोलिसांच्या आयुष्यात दररोज मानसिक संघर्षाची परिस्थिती उद्भवते. शिवाय पोलीस सशस्त्र असतात. त्यामुळे भावनिक संतुलन बिघडल्यास वाकोला गोळीबारासारखे प्रकार घडू शकतात.उपाययोजना करण्यावर भरशारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस दलात भावनांक मोजून तो नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.- देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था)