शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांची औरंगाबादला परिषद

By admin | Updated: May 31, 2017 03:26 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या राज्यातील दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या राज्यातील दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेऊन यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी १२ जून रोजी औरंगाबाद येथे शेतकरी परिषद घेण्याचे ठरविण्यात आले आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे दहा जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, प्रभारी तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा सादर करण्यात आला. किती गावांमधील शेतकरी बाधित होणार आहेत, याची माहिती शरद पवार यांनी जाणून घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, समृद्धीच्या प्रश्नावर आंदोलनाची पुढील भूमिका ठरविण्यासाठी १२ जून रोजी औरंगाबाद येथे शेतकरी परिषद घेण्याचे जाहीर करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील एकूण ८२ हजार ११२ हेक्टर क्षेत्रापैकी समृद्धी प्रकल्पानंतर फक्त २६ हजार ६८ हेक्टर इतकेच क्षेत्र शिल्लक राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.