शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्यात एकसष्ट लाख क्विंटल कापसाची खरेदी !

By admin | Updated: January 7, 2015 00:14 IST

हमीदर ४0५0; पण खरेदी ३९५0 रू पये प्रतिक्विंटलनेच.

राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यात आतापर्यंत शेतकर्‍यांनी ६१ लाख क्विंटल कापूस विकला असून, यातील २६ लाख क्विंटल कापूस भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी केला आहे; पण सीसीआय आणि कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे कापूस खरेदी दर हे हमीदरोपक्षा प्रतिक्विंटल शंभर ते दिडशे रू पयाने कमी असल्याने ३६ लाख क्विंटल कापूस शेतकर्‍यांनी खासगी बाजारात विकला आहे.यावर्षी कापसाला ४0५0 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव केंद्र शासनाने जाहीर केले आहेत. तथापि, कापूस खरेदी करताना प्रतवारीचे निकष लावले जात असल्याने सीसीआय आणि पणन महांसघाकडून प्रत्यक्षात शेतकर्‍यांना ३९00 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल भाव दिले जात आहेत. खासगी बाजारात एवढेच दर तातडीने मिळत असल्याने शेतकर्‍यांचा खासगी बाजाराकडे ओढा आहे. परिणामी ४ जानेवारीपर्यंत राज्यातील शेतकर्‍यांनी ३६ लाख २३ हजार ८८२ क्विंटल कापूस खासगी व्यापार्‍यांना दिला असून, पणन महासंघाने ७ लाख ४१ हजार ४६५ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. राज्यातील कापूस खरेदीसाठी सीसीआयने कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाला उप अभिकर्ता नेमले आहेत. पण सीसीआयनेदेखील या राज्यात स्वतंत्र कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहेत. असे असले तरी या राज्यातील शेतकर्‍यांनी पणन महासंघाऐवजी सीसीआयलाच सर्वाधिक कापूस विकला आहे. दरम्यान यावर्षी साडेसात लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून, शेतकर्‍यांना त्यांचे चुकारे तातडीने देण्यात येत आहेत.शेतकर्‍यांच्या तक्रारी प्राप्त होताच शेतकर्‍यांना तालुक्याच्या ठिकाणी चुकारे देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे पणन महासंघाचं अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी यांनी स्पष्ट केले. *सीसीआयचे आंध्रात हमी दर सिसिआयने आध्रंप्रदेशातील शेतकर्‍यांना ४0५0 रूपये प्रतिक्विंटल या हमीदराने चुकारे केले आहेत. तथापि, महाराष्ट्रात मात्र प्रतवारीचे निकष लावले असून, येथील शेतकर्‍यांना ३९00 ते ३९५0 प्रतिक्विंटलप्रमाणे चुकारे दिले जात आहेत. कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने हेच निकष लावले आहेत.*पणनने केले दोन कोटी नव्वद लाखाचे चुकारे महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महांसघाने आतापर्यंत राज्यात ७ लाख ४१ हजार ४६५ क्विंटल कापूस खरेदी केला असून, २ कोटी ९0 लाख ७६ हजार रू पयाचे चुकारे केले आहेत; पण तालुक्यातील शेतकर्‍यांना चुकार्‍याचे धनादेश मात्र जिल्हास्तरावरील बँकेचे दिले जात असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.