शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

कापूस उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 28, 2015 03:58 IST

कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली असून, अनेक ठिकाणी कापसाचा वेचा संपायला आला आहे. मात्र खासगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसून, हमीदरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.

राजरत्न सिरसाट,  अकोलाकापूस उत्पादनात प्रचंड घट झाली असून, अनेक ठिकाणी कापसाचा वेचा संपायला आला आहे. मात्र खासगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसून, हमीदरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने शेतकऱ्यांना साडेपाचशे ते साडेसहाशे रुपये प्रतिक्ंिंवटल बोनस दिला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना यावर्षी तरी अग्रिम बोनस मिळेल का, याकडे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अग्रिम बोनस देण्याबाबत शासन अनुकूल असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी हीच घोषणा मागील वर्षी अकोल्यात केली होेती; पण शासनाने मागील वर्षी बोनसला खो दिला. या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा बिकट परिस्थिती असून, कापसाचे उत्पादन प्रचंड घटले आहे. विदर्भात कापसाचा उतारा अत्यंत कमी आहे. या वर्षी आतापर्यंत खासगी व्यापाऱ्यांनी राज्यात ६५ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला आहे. कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने २ लाख ५० हजार क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) ५ लाख क्ंिवटलच्यावर खरेदी केली आहे. यावर्षी हमीदर ४१०० रुपये प्रतिक्ंिवटल असले, तरी पणन महासंघ व सीसीआय राज्यातील शेतकऱ्यांकडून प्रतिवारीनुसार कापसाचे दर ठरवत असल्याने प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खासगी बाजार आणि गुजरातकडे कापूस विकण्याचा ओढा आहे.