शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
4
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
5
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
6
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
7
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
8
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
9
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
10
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
11
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
12
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
13
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
14
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
15
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
16
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
17
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
18
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
19
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
20
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार

कापूस उत्पादकांचे पाच हजार कोटी बोंडअळीने खाल्ले

By अतुल कुलकर्णी | Updated: December 8, 2017 03:48 IST

गुलाबी बोंडअळीने कापसाचे पीक फस्त केल्याने बीटी कॉटन बियाणे आणि कीटकनाशकांवर कापूस उत्पादक शेतकºयांनी खर्च केलेले सुमारे पाच हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.

मुंबई : गुलाबी बोंडअळीने कापसाचे पीक फस्त केल्याने बीटी कॉटन बियाणे आणि कीटकनाशकांवर कापूस उत्पादक शेतकºयांनी खर्च केलेले सुमारे पाच हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.यंदा ४२.०६ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. पैकी ९५ टक्के क्षेत्र बीटी कापसाच्या पिकाखाली आहे. यासाठी १ कोटी ६५ लाख बीटी कापसाच्या बियाणांची पाकिटे वापरली गेली. एका पाकिटाची किंमत ७५० रुपये लक्षात घेता फक्त बियाणांवर शेतकºयांचे १२३७ कोटी ३० लाख रुपये खर्च झाले. तर सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये रासायनिक औषधे व खतांवर खर्च केले गेले आहेत.सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ कॉटन रिसर्च या केंद्रीय संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. के.आर. क्रांथी यांच्या समितीने डिसेंबर २०१५ मध्येच विविध राज्यांतल्या कापसाच्या पिकाचा अभ्यास करून बीटी कॉटनचे बियाणे बोंडअळीला बळी पडू नये यासाठी काही उपाय सुचवले होते. मात्र त्यावर केंद्र सरकारने ठोस पावले उचलली नाहीत.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ६ जुलै रोजी राज्य सरकारला पत्र लिहून वेळीच उपाय करा, असे कळवले. मात्र सरकारने दखल घेतली नाही. परिणामी ९५ टक्के कापसाचे पीक बोंडअळीच्या तडाख्यात सापडले.बोंडअळी दाद देत नाही हे पाहून शेतकºयांनी दोन-तीन रासायनिक औषधांचे मिश्रण करून फवारणी केली. त्यात काही शेतकºयांचे जीवही गेले. मात्र हजारो कोटींचा व्यवहार करणाºया कंपन्यांचे मिंधे झालेल्या अधिकाºयांनी आणि प्रशासनाने कोणतीही प्रभावी जनजागृती केली नाही, असा गंभीर आरोप मुंडे यांनी केला आहे.केंद्र शासनाने बीटी तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करण्यासाठी बियाणे उत्पादकांना बी.जी. २ तंत्रज्ञानावर आधारित बियाणे उत्पादनाची परवानगी दिली असून यात ‘ट्रान्सजेनिक जिन्स’ असल्याने बोंडअळीला प्रतिकार करणारे आहे, असा खुलासा कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी केला आहे. मात्र या बियाणांची प्रतिकारशक्ती कशी कमी झाली, हे त्यांनी सांगितले नाही.तुम्ही सरसकट पद्धतीने २० रोपे निवडा, त्यात अळी दिसली तर फवारणी करा, असे अत्यंत बारीक अक्षरात बी.टी. बियाणे कंपन्यांनी माहिती पत्रकात छापलेले असते. मात्र हे कोणी शेतकºयांना सांगत नाही. ही सगळी कंपन्यांची आणि अधिकाºयांची बदमाशी आहे. तंत्रज्ञानात शेतकºयांचा अभिमन्यू करून त्याला आणखी गाळात घातले जात आहे. - विजय जावंधिया, शेतीतज्ज्ञ