शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

कापसाला बोनस नाही, हरब-याचे दर घसरले

By admin | Updated: January 30, 2016 02:14 IST

हातात पैसे नसल्याने शेतक-यांची तारांबळ!

अकोला : पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे सलग दहा वर्षापासून सरासरी उत्पादन घटल्याने शेतकर्‍यांच्या हातात पैसाच शिल्लक नाही. अशा स्थितीत शासनाने घोषणेप्रमाणे कापसाला अग्रीम बोनस दिला नसून, दुसरीकडे बाजारात सोयबीन,तुर, मुग व हरबर्‍याचे दरही कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विदर्भातील कृषी विकासाचा दर गत बारा वर्षांपासून शून्य टक्कयावरच आहे. भरीस भर नैसर्गिक आपत्ती, भूमी अधिग्रहण आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरामुळे या विकास दरात घसरणच सुरू असल्याने विदर्भातील शेतकरी खचला आहे. मागील दहा वर्षाचा कृषी विकासाचा दर कमी-अधिक स्वरू पात असल्याचा निष्कर्ष आहे. त्याचे गंभीर परिणाम विदर्भातील शेतकर्‍यांना सोसावे लागत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. गत पाच वर्षांत शेतकर्‍यांच्या परिस्थितीत तसूभरही सुधारणा झाली नसून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. विदर्भातील पावसाचे प्रमाण असमान असल्याने गेल्या दहा वर्षांत उत्पन्न घटले आहे. शेतकर्‍यांना नफ्याऐवजी तोटाच झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. अतवृष्टी, दुष्काळ यामुळे सरासरी उत्पादन घसरले आहे. यावर्षी सोयाबीन आणि कापसाचे हेक्टरी उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यावर्षी तरी कापसाला अग्रीम बोनस मिळेल अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती; पण अद्याप शासनाने याबाबतीत कोणताच निर्णय घेतला नसून, बाजारात सोयाबीन, तुरीचे दर पडल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या हातात पैसाच शिल्लक नसून, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न या सर्वामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यावर्षी ही परिस्थितीची आणखी भीषण झाली आहे. यावर्षी शेतकर्‍यांना मशागतीला पैसा लागणार आहे; पण शेतकर्‍यांकडे पैसाच नाही. त्यामुळे शेतकरी सावकार, बँकांच्या पायर्‍या झिजवताना दिसत आहेत.थकीत कर्जाच्या वसुलीचा तगादा शासनाने यावर्षी कोणतेही कर्ज वसूल करू नये आणि कर्जाचे पाच वर्षासाठी पुर्नगठण केल्याने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे; पण काही बँकांनी थकीत कर्जासाठी वसुलीसाठी तगादा लावला आहे. यात जिल्हा बँकांचाही समावेश आहे.हरब-याचे दर झाले कमीविक्री हंगाम सुरू होताच हरबर्‍याचे दर ४,६00 रू पये प्रतिक्विंटल होते ते दर आजमितीतीस ४१00 ते ४२00 रू पयावर आले. सोयाबीन व तुरीच्या दरात चढउतार आहे.