शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कापसाची मागणी, पुरवठय़ात तफावत!

By admin | Updated: April 24, 2015 01:40 IST

कापड गिरण्यांची गरज ९0 हजार गाठींची, पुरवठा मात्र ५0 हजार गाठींचाच!

राजरत्न सिरसाट/अकोला: देशभरातील शेतकर्‍यांकडून आजमितीस ३ कोटी २६ लाख ९ हजार गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे. पण देशांतर्गत लागणार्‍या कापसाच्या गाठी व पुरवठय़ात तफावत आहे. सध्या देशांतर्गत कापसाची गरज ही प्रतिदिन ९0 ते ९२ हजार गाठींची आहे; पुरवठा मात्र ५0 हजार गाठींचाच असल्याने खासगी बाजारात कापसाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा सोडला, तर देशात कापसाचे बर्‍यापैकी उत्पादन झाले असून, यावर्षी प्रथमच संपूर्ण देशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) आणि खाजगी व्यापार्‍यांनी हा कापूस खरेदी केला आहे. यामध्ये सीसीआयचा उपअभिकर्ता राज्यातील महाराष्ट्र कापूूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने राज्यात विविध केंद्रांवर खरेदी केलेल्या कापसाचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक ८१ लाख ८३ हजार गाठी कापसाची खरेदी गुजरातमध्ये झाली आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये ७९ लाख ८९ हजार गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ६५ लाख १५ हजार गाठींची विक्री झाली आहे. मध्यप्रदेशात १६ लाख १७ हजार गाठी, कर्नाटक २७ लाख ३८ हजार गाठी, पंजाब ११ लाख २१ हजार गाठी, हरियाणात १९ लाख ३८ हजार गाठी, राजस्थान १६ लाख ५८ हजार गाठी व इतर मिळून ५ लाख ४६ हजार अशा ३ कोटी २६ लाख ९ हजार कापूस गाठींची खरेदी झाली आहे. सध्या दररोज भारतीय बाजारपेठेत ४0 हजार गाठींची आवक सुरू आहे. त्यामुळे येत्या महिन्यात आणखी ४0 ते ५0 लाख गाठी विक्रीला येण्याची शक्यता कापूस व्यापारी वतरुळामध्ये वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, एवढा कापूस खरेदी झाला असताना देशांतर्गत उद्योगांना कापसाचा जवळपास ४0 ते ५0 हजार गाठींचा पुरवठा कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्यांना दररोज जवळपास ९0 ते ९२ हजार गाठींची गरज आहे. तथापि, पुरवठा मात्र ५0 हजार गाठींपेक्षा कमी होत आहे.

*कापसाचे दर वाढण्याची शक्यता

          मागणीपेक्षा पुरवठा कमी आणि यावर्षी पावसाचा वर्तविलेला अंदाज बघता, पुढच्या वर्षी कापसाचे उत्पादन होईल की नाही, यावर मंथन सुरू असल्याने याचाही परिणाम कापसाच्या दरवाढीवर होण्याची शक्यता आहे.