शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी मुख्यालयाच्या नुतनीकरणाचा खर्च ४८ कोटी

By admin | Updated: June 11, 2016 04:02 IST

राज्यात दुष्काळी परिस्थीती असल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधींच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे माहिती नुकतीच समोर आली

मुंबई : राज्यात दुष्काळी परिस्थीती असल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधींच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे माहिती नुकतीच समोर आली होती. त्यामुळे महामंडळाने दुष्काळी परिस्थीती असल्याचे सांगत वर्धापन दिन साधेपणाने साजरा केला होता. मात्र याच परिस्थीतीचा एसटी महामंडळाला आता विसर पडला आहे. महामंडळाने आपल्या मुंबईतील मुख्यालयाच्या नुतनीकरणासाठी तब्बल ४८ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला असून हे काम जुलैपासून सुरु केले जाणार आहे. त्यासाठी कार्यालयातील सामानाची बांधाबांध करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळाचे मुख्यालय असून या मुख्यायलयात ४०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. एसटीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्या कार्यालयांबरोबरच विविध विभागांच्या महाव्यवस्थापकांचीही कार्यालये तेथे आहेत. या इमारतीचे नुतनीकरण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. जवळपास ४८ कोटी रुपये कामासाठी खर्च केले जाणार असून संपूर्ण इमारतीला काचा लावण्यात येणार आहेत. तर प्रत्येक विभाग कार्यालयातील फर्निचरही बदलण्यात येणार आहे. या इमारतीलाच पूर्णपणे कॉर्पोरेट लूक दिला जाईल. मुख्यायालयात असणाऱ्या अनेक कार्यालयांतील सामान आणि कर्मचारी हे दुसरीकडे स्थलांतरीत केले जाणार आहेत. मुख्यालयातील काही कर्मचाऱ्यांना तर विद्याविहार येथील एसटीच्या कार्यालयात पाठविण्याचाही निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)>दुष्काळी भागातील जनतेसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला होता. राज्यातील अनेक भागांत एसटीचे प्रवासी भारमान घटले असून जानेवारी २0१६ पासून आतापर्यंत ७0 कोटींपेक्षा जास्त नुकसान महामंडळाला सोसावे लागत आहे. महामंडळाला दुष्काळाच्या झळा बसत असतानाच आता होणाऱ्या नुतनीकरणाच्या कामावर अनेक उलटसुलट चर्चा महामंडळात आहेत. >नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलाविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. साधारण दोन ते तीन वर्षापूर्वीच एसटी मुख्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यालयांतील अंतर्गत सजावटीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र आता नुतनीकरण केले जाणार असल्याचे हा खर्च वायाच जाणार आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, हे काम जरी होणार असले तरी त्यावर अजून निर्णय बाकी आहे. नुतनीकरणाचे काम हे अंतर्गत केले जाईल, अशी माहीती त्यांनी दिली.