शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मंडईच्या गाळेवाटपात भ्रष्टाचार

By admin | Updated: July 22, 2016 02:36 IST

लोकसभा निवडणुकीच्या भाऊगर्दीत काम अपूर्ण असतानादेखील घाईघाईने गावदेवी भाजी मंडईचा शुभारंभ केला होता.

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या भाऊगर्दीत काम अपूर्ण असतानादेखील घाईघाईने गावदेवी भाजी मंडईचा शुभारंभ केला होता. मंडईच्या बाहेर म्हणजेच गावदेवी मैदानात ठाण मांडून बसलेल्या १५४ भाजी व फळविक्रेत्यांना अखेर हक्काची जागा येथे दिली. आता येथील गाळे आणि ओटलेवाटपात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पालिकेने तयार केलेल्या अहवालातदेखील यात गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. परंतु, त्यावर अद्याप संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल बुधवारी झालेल्या महासभेत सदस्यांनी प्रशासनाला विचारला. अखेर, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी दिले. ठाणे रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर गावदेवी मैदानात ६० वर्षे जुनी मंडई आहे. येथील फेरीवाल्यांनी मैदान व्यापल्याने त्यांना २००३ मध्ये पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, बाजूलाच असलेल्या जागेवर मंडईचे काम सुरू झाले. त्यानंतर, ४ मार्च २०१४ रोजी या मंडईचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर, मागील ६० वर्षे मैदानात आपले बस्तान मांडून बसलेल्या भाजी आणि फळविक्रेत्यांना अखेर हक्काची जागा मिळाली. इमारतीच्या तळ मजल्यावर या भाजीविक्रेत्यांना स्थलांतरित केले आहे. लॉटरी पद्धतीने प्रत्येकाला गाळ्यांचे वाटप करण्यात आले. गाळेवाटपात आणि ओटले वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सदस्य मिलिंद पाटणकर आणि अशोक वैती यांनी केला. पाटणकर यांनी विचारलेल्या प्रश्नानुसार त्यांना हा अहवाल दिला आहे. या अहवालातही गाळे आणि ओटले वाटपात चुका झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार या ओटल्यांचे वाटप अभियंता सुनील जाधव यांनी केले नसल्याचेही नमूद केले आहे. याशिवाय, अनेकांना पूर्वी असलेल्या जागेच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळ दिल्याचेही यात म्हटले आहे. पूर्वीपेक्षा तब्बल ३५ गाळेधारकांना अधिकच्या ओटल्यांची जागा दिली आहे. पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान करण्यास सुनील जाधव जबाबदार असून त्यांच्यावर कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचेही नमूद केले आहे. >परंतु, या प्रकरणात केवळ जाधव हेच दोषी नसून शहर विभागातील खांडपेकर हेदेखील दोषी असल्याचा आरोप माजी महापौर अशोक वैती यांनी केला. त्यांच्याकडे शहर विकास आणि स्थावरचादेखील चार्ज असल्याने त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. अखेर, महापौर तथा पीठासीन अधिकारी संजय मोरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.