शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

आयसीटी योजनेत भ्रष्टाचार?

By admin | Updated: October 14, 2015 03:50 IST

केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने कंत्राट देऊन राबवण्यात येणाऱ्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाने केला आहे

मुंबई : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने कंत्राट देऊन राबवण्यात येणाऱ्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाने केला आहे. योजनेतील संगणक शिक्षकांच्या वाट्याचे कोट्यवधी रुपये कंत्राटदार कंपन्यांनी गिळंकृत केल्याचा आंदोलनकर्त्या संघटनेचा आरोप आहे.सरकारसोबत करार करताना कंपन्यांनी संगणक शिक्षकांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात किमान १२ हजार रुपये मानधन देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५००, दुसऱ्या टप्प्यात २ हजार ५०० आणि तिसऱ्या टप्प्यात ५ हजार संगणक शिक्षकांची भरती करण्यात आली. मात्र पहिल्या टप्प्यातील शिक्षकांचा करार संपेपर्यंत अडीच हजार रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर काम करून घेण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांचा करार २०१६ आणि तिसऱ्या टप्प्यातील शिक्षकांचा करार २०१९मध्ये संपणार आहे. मात्र अद्यापही शिक्षकांना ६ हजार रुपयांपेक्षा जास्त मानधन मिळत नसल्याचा संघटनेचा आरोप आहे.कंत्राटदार कंपन्यांनी शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यात जमा केलेला नाही. अशा प्रकारे सुमारे १५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संघटनेचा आरोप आहे. शिवाय शाळांमध्ये इंटरनेटच्या समस्येची बोंब आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये कंपन्यांना देणाऱ्या शासनाने पंजाब राज्याच्या धर्तीवर संगणक शिक्षकांचे महामंडळ तयार करून कंत्राटी शिक्षकांना सरळ सेवेत घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.