नाशिक : राज्यातील सरकार भ्रष्टाचार करणा:यांच्या पाठीशी असून, त्यामुळेच दोषमुक्त न झालेल्या आदर्श घोटाळ्यातील अधिका:यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. तसेच चितळे समितीच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरेंवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कारवाई करण्याचे टाळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला .
आदर्श घोटाळ्यात फौजदारी गुन्हा दाखल असताना जयराज फाटक यांच्यासह काही अधिका:यांना पुन्हा सेवेत घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता त्यांची न्यायालयाने निदरेष मुक्तता केल्यावरच त्यांना पुन्हा सेवेत घेणो योग्य ठरले आहे. मात्र त्यांचा आदर्श घोटाळ्यात सहभाग होता हे माहीत असूनही सरकारने त्यांना सेवेत घेण्याचा निर्णय हा म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन देण्याचाच प्रकार आहे. येत्या विधानसभेच्या अधिवेशनात ‘आदर्श’ प्रकरणावरून सरकारला धारेवर धरणार आहे. त्याचप्रमाणो चितळे समितीच्या चौकशी अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या अधिवेशनात चितळे समितीचा कृती अहवाल सादर करण्याची मागणी आम्ही लावून धरणार आहोत. राज्य शिखर बॅँकेसंदर्भात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी या प्रकरणात कुणालाही माफ केले जाणार नाही, असे जरी सांगत असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजित पवारांवर कारवाई करणार नाहीत. त्यांना कारवाई करायची असती तर त्यांनी कधीच केली असती, असे खडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आबा सर्वाधिक अपयशी
राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील हे आतार्पयतचे सर्वाधिक अपयशी गृहमंत्री आहेत. गुन्हेगारी रोखण्यात त्यांना सपशेल अपयश आले आहे. खंडणी, खून, दलितांवरील अत्याचारात दिवसागणिक वाढच होत आहे. पोलिसांशी गुन्हेगारांशी साटेलोटे असल्यानेच हे सर्व घडत असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
मुंडेंच्याच नेतृत्वात निवडणुका
विधानसभा निवडणुका केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील, याचा पुनरुच्चार खडसे यांनी केला. मात्र राज्याचा मुख्यमंत्री ठरविण्याचा अधिकार भाजपाचा नसून तो शिवसेना आणि महायुतीतील घटक पक्ष मिळून ठरवतील,असेही त्यांनी स्पष्ट केले.