शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

माजी मंत्री विजयकुमार गावितांवर भ्रष्टाचाराचा ठपका

By admin | Updated: May 6, 2017 09:20 IST

आदिवासी विकास योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एम.जी. गायकवाड चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २००४ ते २००९ या काळात आदिवासी विकास योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एम.जी. गायकवाड चौकशी समितीच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. या घोटाळ्याचा ठपका तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आदिवासी विकास विभागात ६००० कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप नाशिकचे बहिराम मोतीराम यांनी अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी व अ‍ॅड. रत्नेश दुबे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिकेमार्फत केला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला. तत्कालीन मंत्री गावित यांनी दिलेल्या आदेशामुळे सरकारला ३ कोटी ९० लाख ८६ हजार ३७६ रुपयांचा  फटका बसला आहे, असा ठपका  ठेवत प्रादेशिक व्यवस्थापक अधिकाऱ्यांनी (आरएमओ) एकूण १४ कोटी ८९ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा अपहार केला, असा निष्कर्ष समितीने काढला. गॅस बर्नर खरेदीमध्येही घोटाळा झाल्याचे समितीने म्हटले आहे.  १ लाख २३ हजार ९९८ गॅस बर्नर खरेदीची आॅर्डर देण्यात आली.  मात्र महामंडळाच्या घाईमुळे २५,५२७ गॅस बर्नरचे वापटच झाले  नाही. त्यामुळे हे बर्नर गंजले आणि निकामी झाले. ७३ कोटी रुपयांचा अपहारप्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला आहे. आर्थिक वर्षाच्या सरतेशेवटी उरलेला निधी केंद्र व राज्य सरकारकडे परत करणे आवश्यक आहे. मात्र या अधिकाऱ्यांनी तसे केले नाही. त्याचा लेखाजोखा ठेवलेला नाही. कॅश बुकमध्येही नोंद केली नाही. योजनेची अंमलबजावणी करताना कंत्राटदारांना दिलेल्या आगाऊ रकमेचीही कुठेही नोंद केली नाही. दरवेळेस ठरावीक कंत्राटदारालाच कंत्राट देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी एकूण ७२ कोटी ७४ लाख ७४ हजार ८९१ कोटी रुपयांचा अपहार केला आहे, असा निष्कर्ष समितीने काढला आहे. माजी मंत्री विजयकुमार गावित सध्या भाजपामध्ये आहेत.