शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सुभाष देसार्इंवर भ्रष्टाचाराचे आरोप : हकालपट्टीची मागणी : विरोधकांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 05:33 IST

मुंबई : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या काळात राज्याच्या उद्योग विभागात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करीत देसाई यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी आणि संपूर्ण प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी जोरदार मागणी करीत विरोधी पक्ष सदस्यांनी विधिमंडळाची दोन्ही सभागृहे दणाणून सोडली.जमीन अधिसूचित करायची व पैशांचा व्यवहार करून ती पुन्हा सोयीस्करपणे वगळून टाकायची, ...

मुंबई : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या काळात राज्याच्या उद्योग विभागात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करीत देसाई यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी आणि संपूर्ण प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी जोरदार मागणी करीत विरोधी पक्ष सदस्यांनी विधिमंडळाची दोन्ही सभागृहे दणाणून सोडली.जमीन अधिसूचित करायची व पैशांचा व्यवहार करून ती पुन्हा सोयीस्करपणे वगळून टाकायची, असा प्रकार उद्योग विभागात होत असल्याचा आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. उदाहरण देताना ते म्हणाले की, नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मौजे गोंदे (दुमाला) येथील अधिसूचित जमिनीपैकी ३० हेक्टर जमीन वगळण्याबाबत स्वस्तिक प्रॉपर्टी, मुंबई यांनी उद्योग विभागाला विनंती केली आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला.विद्यमान उद्योगमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा भूसंपादनास विरोध असल्याचे कारण सांगून स्वस्तिक प्रॉपर्टी, मुंबई या फर्मला सोडली. ही फर्म मुंबईत बांधकाम करणारी कंपनी आहे. त्यांचे अनेक गृहनिर्माण प्रकल्प आहेत. त्यामुळे ही कंपनी शेतकरी कशी असू शकते, असा सवाल करीत विखे पाटील संबंधित पुरावे दाखवले. या जमिनी बिल्डरांच्या घशात घालून उद्योग विभागाने मेक इन महाराष्ट्राला फेक इन महाराष्ट्र करण्याचे काम केले आहे. या प्रकरणी ईडीमार्फत चौकशी अन् देसार्इंच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली.विधान परिषदेतही गोंधळविधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उद्योग विभागाचा अन्य एक घोटाळा बाहेर काढला. नाशिकजवळील वाडिव्हरे येथील ६०० एकर जमीन नहार ग्रुपला मोकळी करून दिल्याचा नवा आरोप करत सुभाष देसाई यांचा राजीनामा घेऊन एसआयटी चौकशीची मागणी केली.देसाई यांनी विरोधी पक्षनेत्यांनी केलेले आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला; पण विरोधकांनी त्यांना बोलू दिले नाही. यामुळे उडालेल्या गोंधळामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.नियमबाह्य काहीच केले नाही : देसाईनाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मौजे गोंदे (दुमाला) येथे एमआयडीसीसाठी अधिसूचित जमीन मोकळी करण्याचा निर्णय तेथील शेतकºयांच्या मागणीनुसार आणि एमआयडीसीने दिलेल्या प्रस्तावाच्या आधारेच घेण्यात आला. विशिष्ट व्यक्तींना लाभ पोहोचविण्याचा हेतू कधीही नव्हता, असा खुलासा शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत केला.शिवसेनेचे सदस्य झाले आक्रमकराष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही देसार्इंच्या निर्णयावर टीका करीत भ्रष्टाचाराचे आरोप केले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तर या सर्व व्यवहाराची फाइलच सभागृहात दाखविली. त्यातील एकेक मुद्द्यावर ते बोलू लागताच शिवसेनेचे सदस्य संतप्त होऊन पुढे आले आणि त्यांनी पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी असंसदीय शब्दांचा वापर विरोधकांबाबत केला.मेहता यांनाही केले लक्ष्यअध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी त्यांचे शब्द कामकाजातून काढले; पण पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर, पाटील यांनी बळेच दिलगिरी व्यक्त करतानाही विरोधकांची खिल्ली उडविली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी केली आणि नंतर देसाई यांना लक्ष्य केले.