शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

भ्रष्टाचाराचे मूळ नवसात!

By admin | Updated: May 7, 2017 03:50 IST

भ्रष्टाचाराने भारतीय समाजजीवनाचे सर्वांग ओरबाडून व्यापले आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण

  - डॉ. नीरज देव -भ्रष्टाचाराने भारतीय समाजजीवनाचे सर्वांग ओरबाडून व्यापले आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण व धर्मकारण या ना त्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा मुक्त संचार पाहायला मिळतो.बरे! त्याला प्रतिष्ठाही भरपूर, लग्नाच्या बाजारात जा तिथे ‘जावईबापू तुमची वरकमाई किती?’ हा प्रश्न अगदी अदबीने विचारला जातो आणि इतरांना आमच्या जावयाची वरकमाई पगारापेक्षा जास्त आहे, हे तोऱ्यात सांगितले जाते.इतकेच कशाला, या प्रतिष्ठित भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार गंगा म्हणत, आम्ही आध्यात्मिक अधिष्ठानही प्रदान करतो. जसे त्या गंगेत धुतल्यावर पापाचे पुण्य होते, तसेच या भ्रष्टाचार गंगेत धुतल्यावर असत्यातील असत्य सत्य होऊन बाहेर पडते. मला आश्चर्य वाटले, सत्य नि ईश्वर यांना केंद्रस्थानी मानणाऱ्या आध्यात्मिक भारतात भ्रष्टाचाराला एवढी प्रतिष्ठा कशी?अन् मला अचानक लक्षात आले, याला कारण इथले तथाकथित धार्मिक वातावरण. त्यामुळे म्हणा की, देवलसीपणामुळे म्हणा, एक भावना तयार झाली, जे काही मागायचे ते देवाकडे मागावे. ही भावना केवळ धर्मभोळ्या हिंदूतच नसते, तर सर्वच धर्मोपधर्मात असते. एक शायर म्हणतो,मांगना हो जो बशीर खुदासे मांगियेजिनसे माँगनेसे शर्मिंदगी नही होतीम्हणणे शत प्रतिशत बरोबर, पण एक विचार मनांत डोकावतो, आपण परमेश्वराला सर्वव्यापी समजतो, तर मग त्याला आपल्या इच्छा वा गरजा कळू नयेत का? अन् जर त्याला त्या कळत असतील व रास्त वाटत असतील, तर तो स्वत: होऊन देणार नाही का? मग मला मागण्याची गरजच का पडावी? गालिबलाही हाच सवाल पडला होता म्हणून दिवान-ए-गालिबमध्ये तो स्वत:लाच पुसतो...गालिब न कर हुजुरपर बार बार तू अर्जजाहीर है तेरा हाल सब उनपर कहे बगैरअर्थात,गालिब ना करी तू वारंवार नवसाससांगितल्याविन त्या कळे तुझ्या मनीची आसखरेय मग नवसाचे मूल्यच राहात नाही. तुकोबा तर रोकडा सवाल करतात, नवसाने पोरे होत असतील, तर नवऱ्यांची गरजच का पडावी? ही गोष्ट कबीराने जरा अधिकच स्पष्ट केली तो गातो,कंकड पत्थर बाँधकर मस्जिद लय बनायतापर मुल्ला बाँग दे क बहिरा हुवा खुदाय?चिंटी के पद नेवर बांजे सो भी साहब सुनता है ।अंदर तेरे कपट करतनी सो भी साहब लखता है ।मुंगीच्या पायातील घुंगराचा आवाज त्याला ऐकू येतो आणि तुझ्या मनातील कपट कारस्थान त्याला कळतात. त्याला नाभीच्या देठापासून बोंबलून तू काय सांगणार? पण जिथे आमचा स्वत:वरच विश्वास नाही, तिथे तो कधी न पाहिलेल्या देवावर तरी कसा बसणार? आम्हाला वाटणार जिथे रडल्याशिवाय आई दूध देत नाही, तर मागितल्याविना तो तरी कसा काय देणार? बरे मागितलेले देव असे कसे देणार? त्याला बदल्यात काहीतरी द्यावे लागेलच ना? हे मोबदलासदृश देणे म्हणजेच नवस वा मन्नत.बरे हा नवस तरी कसा ? ‘देवा, तू मला पास कर मी तुला अकरा रुपयांचे पेढे वाटीन’, ‘तू मला एक कोटीची लॉटरी लावून दे, मग मी तुला एक हजार एक रुपये वाहीन’ वा ‘मला मुलगा होऊ दे, मी तुला बकरा वाहीन’ काय गंमत बघा, एक करोडच्या बदल्यात एक हजार रुपये, पास करण्याच्या बदल्यात पेढे, मुलाच्या बदल्यात बकरा! देवाला मतिमंद समजतो की काय आपण? बरे ते पेढे असो वा बोकड त्या देवाने नुसते पाहायचे आणि प्रसाद म्हणून आपणच गट्टम करायचे. म्हणजे देवभोळेपणात भक्त बेरका अन् देवच भोळा झाला की हो.(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत)