शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराचे मूळ नवसात!

By admin | Updated: May 7, 2017 03:50 IST

भ्रष्टाचाराने भारतीय समाजजीवनाचे सर्वांग ओरबाडून व्यापले आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण

  - डॉ. नीरज देव -भ्रष्टाचाराने भारतीय समाजजीवनाचे सर्वांग ओरबाडून व्यापले आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण व धर्मकारण या ना त्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा मुक्त संचार पाहायला मिळतो.बरे! त्याला प्रतिष्ठाही भरपूर, लग्नाच्या बाजारात जा तिथे ‘जावईबापू तुमची वरकमाई किती?’ हा प्रश्न अगदी अदबीने विचारला जातो आणि इतरांना आमच्या जावयाची वरकमाई पगारापेक्षा जास्त आहे, हे तोऱ्यात सांगितले जाते.इतकेच कशाला, या प्रतिष्ठित भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार गंगा म्हणत, आम्ही आध्यात्मिक अधिष्ठानही प्रदान करतो. जसे त्या गंगेत धुतल्यावर पापाचे पुण्य होते, तसेच या भ्रष्टाचार गंगेत धुतल्यावर असत्यातील असत्य सत्य होऊन बाहेर पडते. मला आश्चर्य वाटले, सत्य नि ईश्वर यांना केंद्रस्थानी मानणाऱ्या आध्यात्मिक भारतात भ्रष्टाचाराला एवढी प्रतिष्ठा कशी?अन् मला अचानक लक्षात आले, याला कारण इथले तथाकथित धार्मिक वातावरण. त्यामुळे म्हणा की, देवलसीपणामुळे म्हणा, एक भावना तयार झाली, जे काही मागायचे ते देवाकडे मागावे. ही भावना केवळ धर्मभोळ्या हिंदूतच नसते, तर सर्वच धर्मोपधर्मात असते. एक शायर म्हणतो,मांगना हो जो बशीर खुदासे मांगियेजिनसे माँगनेसे शर्मिंदगी नही होतीम्हणणे शत प्रतिशत बरोबर, पण एक विचार मनांत डोकावतो, आपण परमेश्वराला सर्वव्यापी समजतो, तर मग त्याला आपल्या इच्छा वा गरजा कळू नयेत का? अन् जर त्याला त्या कळत असतील व रास्त वाटत असतील, तर तो स्वत: होऊन देणार नाही का? मग मला मागण्याची गरजच का पडावी? गालिबलाही हाच सवाल पडला होता म्हणून दिवान-ए-गालिबमध्ये तो स्वत:लाच पुसतो...गालिब न कर हुजुरपर बार बार तू अर्जजाहीर है तेरा हाल सब उनपर कहे बगैरअर्थात,गालिब ना करी तू वारंवार नवसाससांगितल्याविन त्या कळे तुझ्या मनीची आसखरेय मग नवसाचे मूल्यच राहात नाही. तुकोबा तर रोकडा सवाल करतात, नवसाने पोरे होत असतील, तर नवऱ्यांची गरजच का पडावी? ही गोष्ट कबीराने जरा अधिकच स्पष्ट केली तो गातो,कंकड पत्थर बाँधकर मस्जिद लय बनायतापर मुल्ला बाँग दे क बहिरा हुवा खुदाय?चिंटी के पद नेवर बांजे सो भी साहब सुनता है ।अंदर तेरे कपट करतनी सो भी साहब लखता है ।मुंगीच्या पायातील घुंगराचा आवाज त्याला ऐकू येतो आणि तुझ्या मनातील कपट कारस्थान त्याला कळतात. त्याला नाभीच्या देठापासून बोंबलून तू काय सांगणार? पण जिथे आमचा स्वत:वरच विश्वास नाही, तिथे तो कधी न पाहिलेल्या देवावर तरी कसा बसणार? आम्हाला वाटणार जिथे रडल्याशिवाय आई दूध देत नाही, तर मागितल्याविना तो तरी कसा काय देणार? बरे मागितलेले देव असे कसे देणार? त्याला बदल्यात काहीतरी द्यावे लागेलच ना? हे मोबदलासदृश देणे म्हणजेच नवस वा मन्नत.बरे हा नवस तरी कसा ? ‘देवा, तू मला पास कर मी तुला अकरा रुपयांचे पेढे वाटीन’, ‘तू मला एक कोटीची लॉटरी लावून दे, मग मी तुला एक हजार एक रुपये वाहीन’ वा ‘मला मुलगा होऊ दे, मी तुला बकरा वाहीन’ काय गंमत बघा, एक करोडच्या बदल्यात एक हजार रुपये, पास करण्याच्या बदल्यात पेढे, मुलाच्या बदल्यात बकरा! देवाला मतिमंद समजतो की काय आपण? बरे ते पेढे असो वा बोकड त्या देवाने नुसते पाहायचे आणि प्रसाद म्हणून आपणच गट्टम करायचे. म्हणजे देवभोळेपणात भक्त बेरका अन् देवच भोळा झाला की हो.(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत)