शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची होणार पुन्हा ‘दिवाळी’

By admin | Updated: November 4, 2016 01:16 IST

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी बहुरंगी लढत होणार आहे.

बारामती : दिवाळीचा सण उत्साहात साजरा झाला. त्यानंतर विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी बहुरंगी लढत होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची पुन्हा ‘दिवाळी’ होणार, अशी चर्चा आता रंगली आहे. सध्या नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या ११ तारखेपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांकडून विद्यमान नगरसेवकांना डावलले गेल्यास पक्षाच्या उमेदवाराला डावलून मतदान होण्याची शक्यता आहे. बहुरंगी लढत असल्यामुळे घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे. नगरसेवकांसाठी तर दिवाळीनंतरची निवडणूक दिवाळी पर्वणी ठरणार आहे. यापूर्वी झालेल्या दोन निवडणुका तशा एकतर्फीच झाल्या. त्यामुळे फारसा ‘आर्थिक पाझर’ या निवडणुकीसाठी पात्र असलेल्यांपर्यंत आला नाही, त्याच अनुषंगाने एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यावर चंगळच होणार, अशी चर्चा रंगत आहे. नगरपालिका निवडणूक तोंडावर असताना सध्याच्या विद्यमान नगरसेवकांना मात्र चांगलाच भाव आला आहे. पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या अनिल भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे संजय जगताप, भाजपाचे अशोक येनपुरे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर खंडागळे, मनसेचे राजेंद्र वागसकर या प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.>बहुरंगी लढतीने नगरसेवकांचे महत्त्व वाढले...विधान परिषदेच्या पूर्वीचा समझोता बासनात गुुंडाळून राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच जागांवर त्यांचे उमेदवार दिले. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली. पुणे विधान परिषदेच्या एका जागेसाठीदेखील भोसले यांच्या विरोधात काँग्रेसचे जगताप यांची लढत महत्त्वपूर्ण आहे. तसेच, अन्य दिग्गज ३ उमेदवार असल्याने नगरसेवकांचे मत मिळविण्यासाठी या ५ उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.विशेषत: दिवाळीनंतरची दुसऱ्या दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी करताना उमेदवारांनाही नाकीदम येणार आहे. एकेका नगरसेवकांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी पंचरंगी लढत दिसत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या ५ नोव्हेंबरनंतर चित्र स्पष्ट होईल.>‘रसद’च ठरणार महत्त्वाची : या जागेसाठी एकूण ६८७ मतदार पात्र आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक २९८, काँग्रेसचे १२४, शिवसेनेचे ७६, भाजपाचे ७१, मनसेच्या ३६, रिपाइंच्या ४, लोकशाही आघाडी १२, शिरूर शहर विकास आघाडी १८, अपक्ष २६ अशी मतांची गोळाबेरीज आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्याचा जादूई आकडा गाठण्यासाठी ‘रसद’च महत्त्वाची ठरणार आहे.