शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर टोलमाफीसाठी नगरसेवकांचा आटापिटा

By admin | Updated: May 23, 2017 02:30 IST

वरळी सागरी मार्गापाठोपाठ आता राज्यातील सर्व टोल नाक्यांवरही विनामूल्य प्रवासासाठी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची धावपळ सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वरळी सागरी मार्गापाठोपाठ आता राज्यातील सर्व टोल नाक्यांवरही विनामूल्य प्रवासासाठी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. खासदार आणि आमदार यांना देण्यात येणाऱ्या या सवलतीप्रमाणे नगरसेवकांनाही राज्यातील सर्वच टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात यावी, अशा ठरावाची सूचना पालिकेच्या महासभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आली आहे.नगरसेवकांना अनेक उपक्रमांची पाहणी करण्यासाठी बऱ्याच वेळा शहराबाहेर जावे लागते. अशा वेळी मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक वगळता मुंबईबाहेरील सर्व टोलनाक्यांवर टोल भरावा लागतो. खासदार व आमदार यांना राज्यातील सर्व टोलनाक्यांवर विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात येते. या सवलतीच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना राज्यातील सर्व टोलनाक्यांवरून विनामूल्य प्रवास करण्याची सवलत मिळावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक तुकाराम पाटील यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. हा ठराव महासभेत मंजूर करून अभिप्रायासाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.नगरसेवकांना काय काय मिळते?नगरसेवकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन, पालिका महासभेच्या प्रत्येक बैठकीचे मिळून चारशे ते सहाशे रुपये, इतर समित्यांच्या बैठकांचे मानधन मिळत असते़ तसेच २००७ पासून लॅपटॉप देण्यात येत आहेत़ गेल्या वर्षी मोबाइल फोन व १२०० रुपयांपर्यंत बिलाची रक्कम, बेस्टचा मोफत प्रवास, वातानुकूलित बसगाड्यांमधून मोफत प्रवास मिळत आहे़नगरसेवकांच्या प्रलंबित मागण्यामानधन दहा हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करणे, बैठकीत उपस्थित राहण्याचा भत्ता प्रत्येक बैठकीचे दीडशे रुपयांवरून पाचशे रुपये वाढ करावी, नगरसेवकांना निवृत्तिवेतन, विमा योजनेचा लाभ, जलतरण तलावाचे मोफत सदस्यत्व, कार्यालयासाठी तसेच घरासाठी भूखंड, मुंबईतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, वांद्रे-वरळी समुद्र सेतूवरून मोफत प्रवास अशा मागण्या यापूर्वी करण्यात आल्या आहेत़यासाठी हवी टोलमाफीमुंबईमध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविले जात असून शहरातील सुमारे सव्वा कोटी जनतेला अत्यावश्यक नागरी सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेचे नगरसेवक सातत्याने कार्यरत असतात. यासाठी नगरसेवकांना मुंबईबाहेर विविध राजकीय व सामाजिक मेळाव्यांना उपस्थित राहावे लागते. तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्येही राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांनाही हजेरी लावावी लागते. त्यामुळे राज्यातील सर्व टोल नाक्यांवर मुंबईच्या नगरसेवकांना टोलमाफी दिली जावी, असे मत ठरावाच्या सूचनेतून मांडण्यात आले आहे.