शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आपत्ती व्यवस्थापनात घेणार कार्पोरेट मदत - चंद्रकांत पाटील

By admin | Updated: June 1, 2017 03:04 IST

नैसर्गिक आपत्तींसोबतच रासायनिक आणि औद्योगिक आपत्तींना प्रतिबंध करणे किंवा अशा दुर्घटना घडल्यास त्यांना योग्य पद्धतीने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नैसर्गिक आपत्तींसोबतच रासायनिक आणि औद्योगिक आपत्तींना प्रतिबंध करणे किंवा अशा दुर्घटना घडल्यास त्यांना योग्य पद्धतीने सामारे जाण्यासाठी कार्पोरेट सहभाग घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. रासायनिक आणि औद्योगिक आपत्ती व्यवस्थापन (सीआयडीएम) या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र आणि गुजरात सरकारसह विविध सरकारी यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने सीआयडीएम परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, रासायनिक, औद्योगिक आपत्ती व्यवस्थापनासाठी शासन सदैव सज्ज आहेच, परंतु उद्योग, रासायनिक कंपन्या, संस्था आणि व्यक्तिगत स्तरावर सदैव सज्ज राहण्याची आवश्यकता अधिक आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी सामूहीक प्रयत्नांची गरज आहे. राज्यात मुख्यत्वे रासायनिक प्रक्रिया, उत्पादन, साठवण, वाहतूक आणि विषारी कच-याच्या विल्हेवाटीदरम्यान औद्योगिक दुर्घटना होतात. अनेक गोदामे हे निवासी आणि औद्योगिक वसाहतींच्या जवळपास आहेत त्यामुळे या भागांचा धोका वाढतो, असे पाटील म्हणाले.उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, ‘१९८४ मधील भोपाळ दुर्घटनेनंतर अनेक उपाययोजना राबविल्या गेल्या. त्यानंतर मोठ्या रासायनिक व औद्योगिक दुर्घटना कमी झाल्या. मात्र दुर्घटना थांबलेल्या नाहीत. गेल्या वर्षी डोंबिवलीत झालेल्या जीवितहानीमुळे ही बाब समोर आली.’सर्वोत्तम कार्यप्रणालीवर भरया परिषदेसाठी देशातील वीस राज्यातील चारशे हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. परिषदेत, विश्वस्तरावरील औद्योगिक सुरक्षा पद्धतीवर भर देणे, औद्योगिक अपघातांना तातडीने प्रतिसाद, सुरक्षेमध्ये उत्कृष्ट पद्धती राबविलेल्या कंपन्यांची यशोगाथा, घातक/विषारी द्रव्ये, पेट्रोलियम उत्पादने आणि गॅस आदींच्या वाहतुकीवेळी अपघात कमी करण्यासाठी सर्वोत्तम कार्यप्रणाली आणि तंत्रज्ञान निर्मिती आदी बाबींवर भर दिला जाईल.