शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

आपत्ती व्यवस्थापनात घेणार कार्पोरेट मदत - चंद्रकांत पाटील

By admin | Updated: June 1, 2017 03:04 IST

नैसर्गिक आपत्तींसोबतच रासायनिक आणि औद्योगिक आपत्तींना प्रतिबंध करणे किंवा अशा दुर्घटना घडल्यास त्यांना योग्य पद्धतीने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नैसर्गिक आपत्तींसोबतच रासायनिक आणि औद्योगिक आपत्तींना प्रतिबंध करणे किंवा अशा दुर्घटना घडल्यास त्यांना योग्य पद्धतीने सामारे जाण्यासाठी कार्पोरेट सहभाग घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. रासायनिक आणि औद्योगिक आपत्ती व्यवस्थापन (सीआयडीएम) या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र आणि गुजरात सरकारसह विविध सरकारी यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने सीआयडीएम परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, रासायनिक, औद्योगिक आपत्ती व्यवस्थापनासाठी शासन सदैव सज्ज आहेच, परंतु उद्योग, रासायनिक कंपन्या, संस्था आणि व्यक्तिगत स्तरावर सदैव सज्ज राहण्याची आवश्यकता अधिक आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी सामूहीक प्रयत्नांची गरज आहे. राज्यात मुख्यत्वे रासायनिक प्रक्रिया, उत्पादन, साठवण, वाहतूक आणि विषारी कच-याच्या विल्हेवाटीदरम्यान औद्योगिक दुर्घटना होतात. अनेक गोदामे हे निवासी आणि औद्योगिक वसाहतींच्या जवळपास आहेत त्यामुळे या भागांचा धोका वाढतो, असे पाटील म्हणाले.उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, ‘१९८४ मधील भोपाळ दुर्घटनेनंतर अनेक उपाययोजना राबविल्या गेल्या. त्यानंतर मोठ्या रासायनिक व औद्योगिक दुर्घटना कमी झाल्या. मात्र दुर्घटना थांबलेल्या नाहीत. गेल्या वर्षी डोंबिवलीत झालेल्या जीवितहानीमुळे ही बाब समोर आली.’सर्वोत्तम कार्यप्रणालीवर भरया परिषदेसाठी देशातील वीस राज्यातील चारशे हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. परिषदेत, विश्वस्तरावरील औद्योगिक सुरक्षा पद्धतीवर भर देणे, औद्योगिक अपघातांना तातडीने प्रतिसाद, सुरक्षेमध्ये उत्कृष्ट पद्धती राबविलेल्या कंपन्यांची यशोगाथा, घातक/विषारी द्रव्ये, पेट्रोलियम उत्पादने आणि गॅस आदींच्या वाहतुकीवेळी अपघात कमी करण्यासाठी सर्वोत्तम कार्यप्रणाली आणि तंत्रज्ञान निर्मिती आदी बाबींवर भर दिला जाईल.