शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

‘कॉर्पोरेट सेक्टरचे सहकार्य आवश्यक’

By admin | Updated: March 26, 2016 01:49 IST

समाजातील तळागाळातील व्यक्तींची जोपर्यंत सामाजिक व आर्थिक प्रगती होणार नाही तोपर्यंत देशाची आर्थिक प्रगती होणार नाही. ही बाब लक्षात घेऊनच केंद्र शासन व राज्य शासन

मुंबई : समाजातील तळागाळातील व्यक्तींची जोपर्यंत सामाजिक व आर्थिक प्रगती होणार नाही तोपर्यंत देशाची आर्थिक प्रगती होणार नाही. ही बाब लक्षात घेऊनच केंद्र शासन व राज्य शासन अनुसुचित जाती व जमातीच्या उदयोजकांसाठी विशेष योजना राबवित असून त्यात कॉर्पोरेट सेक्टरमधील उद्योजकांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज (डिक्की), केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर्षानिमित्त गोरेगांव येथील बॉम्बे कन्वेनशन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये पाचवे नॅशनल ट्रेड अ‍ॅन्ड एक्स्पो २०१६ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कुलराज मिश्रा, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, राज्याचे शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी प्रास्ताविक भाषणात भारतामध्ये सव्वा लाख उद्योजक बनविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)कलराज मिश्रा यांनी आपल्या भाषणात केंद्र शासनातर्फे अनुसूचित जाती व जमातींसाठी देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा आढावा घेतला. गेहलोत यांनी समाजातील मागसवर्गीय महिला सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र शासन विविध योजना राबवित असल्याचे सांगितले. सार्वजनिक उपक्रमांतर्गत येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील बँकेच्या शाखेतून दोन उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी विशेष आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.