शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 04:39 IST

देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक ५६% सक्रिय रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असून संसर्गाची तीव्रताही अधिक असल्याचे दिसून आले आहे.राज्यात ११ फेब्रुवारी २०२१ रोजी काेराेनाचे ३०,२६५ इतके सक्रिय रुग्ण होते, तर आता ७ एप्रिलच्या नोंदीनुसार या संख्येने पाच लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. १७ सप्टेंबर २०२० रोजी ३ लाख १ हजार ७५२, तर ७ एप्रिल रोजी ५ लाख १ हजार ५५९ सक्रिय रुग्णांची नाेंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. बुधवारी पहिल्यांदा पॉझिटिव्हीटीचे प्रमाण १५ टक्क्यांवर गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३६ टक्क्यांवर असून मृत्युदर १.७९ टक्के आहे. देशभरात राज्यात सर्वाधिक ५६ टक्के सक्रिय रुग्ण आहेत.सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या पहिल्या तीन राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक २.८० टक्के मृत्यूदर असून त्याखालोखाल सिक्कीमध्ये २.१६ टक्के आहे, त्यानंतर राज्यात हे प्रमाण १.७९ टक्क्यावंर आहे.राज्यात १ एप्रिल ते ७ एप्रिल २०२१ या कालावधीत केवळ सात दिवसांत ३ लाख ६० हजार १९३ रुग्णांची नोंद झाली आहे.संसर्गाचा पहिला भर/ पहिली लाट आणि सध्याची परिस्थिती यांची तुलना (रुग्णसंख्या)जिल्हा/ शहर    पहिली शिखर पातळी    ६ एप्रिल २०२१ची      सप्टेंबर २०२०       परिस्थितीमुंबई     ३४,२५९       ७९,३६८पुणे     ८२,१७२      ८४,३०९नाशिक     १६,५५४      ३१,६८८औरंगाबाद     १०,०५८      १७,८१८नागपूर     २१,७४६       ५७,३७२ठाणे     ३८,३८८       ६१,१२७

राज्यात ११ फेब्रुवारी २०२१ रोजी ३०,२६५ सक्रिय रुग्ण होते, ७ एप्रिलला सक्रिय रुग्णांनी पाच लाखांचा टप्पा ओलांडला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या