शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

CoronaVirus Lockdown : मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकर आहेत हे विसरलात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:44 IST

गेल्या आठ दिवसांत मुंबईकरांमुळे कोल्हापुरात कोरोनाची संख्या वाढली, त्यांच्यामुळेच कोल्हापूरची स्थिती बिघडली, अशी हेटाळणी करणारी भाषा सर्वच स्तरांवर वापरली जात असून, ती आपल्याच माणसामाणसांमध्ये दरी निर्माण करणारी आहे. असे ज्यांना वाटते, त्यांनी मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकर आहेत हे विसरता कामा नये. कोरोनाचे संकट आज नाही तर उद्या दूर होईल; परंतु त्यातून तयार झालेला दुरावा पुढची कित्येक वर्षे गावागावांत मतभेदाचे चटके देत राहील, याचे भान बाळगण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकर आहेत हे विसरलात का?समाजात दरी नको : दक्षता घ्या; परंतु हाकलून लावण्याची भाषा नको

विश्वास पाटीलकोल्हापूर : गेल्या आठ दिवसांत मुंबईकरांमुळे कोल्हापुरात कोरोनाची संख्या वाढली, त्यांच्यामुळेच कोल्हापूरची स्थिती बिघडली, अशी हेटाळणी करणारी भाषा सर्वच स्तरांवर वापरली जात असून, ती आपल्याच माणसामाणसांमध्ये दरी निर्माण करणारी आहे. असे ज्यांना वाटते, त्यांनी मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकर आहेत हे विसरता कामा नये. कोरोनाचे संकट आज नाही तर उद्या दूर होईल; परंतु त्यातून तयार झालेला दुरावा पुढची कित्येक वर्षे गावागावांत मतभेदाचे चटके देत राहील, याचे भान बाळगण्याची गरज आहे.कोल्हापुरात मूळचा स्थानिक रुग्ण एकही सापडलेला नाही. बाहेरून प्रवास करून जे आले त्यांच्यामुळेच कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झाला आहे हे मान्यच; परंतु जे बाहेरून म्हणजे मुख्यत: मुंबईतून आले ते काही मूळचे मुंबईचे नव्हेत. त्यांची जन्मभूमी कोल्हापूर आहे. ते आपलेच भाऊबंद आहेत. येथे पोट भरत नाही म्हणून उदरनिर्वाह शोधण्यासाठी ते मुंबईला गेले.

पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यावर त्यांना गावी येता आले नाही. जे अविवाहित होते ते एक बॅग घेऊन रस्त्याला लागले; परंतु जे कुटुंबासह राहतात त्यांतील बहुतांश काही ना काही उद्योग करतात. त्यामुळे सगळेच तिथे टाकून त्यांना लगेच मुंबई सोडणे शक्य नव्हते. शिवाय गावांकडूनही नाके बंद आहेत, सोडत नाहीत, तुम्ही इकडे येऊ नका असे त्यांना फोन गेले; त्यामुळे हे लोक दीड-दोन महिने तिथे अडकले. तिथे रोजगार नाही, दहा बाय दहाच्या खोलीत ४० अंश तापमान असताना राहायची पाळी त्यांच्यावर आली.

अनेकांना पोटाला काय खायचे असा प्रश्न तयार झाला. त्यानंतर सरकारने त्यांना गावी जायची परवानगी दिल्यावर हे लोक कोल्हापूरला आले आहेत. त्यांच्यापासून संसर्गाचा धोका आहे हे मान्य केले तरी आवश्यक ती दक्षता घेऊन व सर्व प्रकारच्या तपासण्या करून त्या लोकांना गावांनी आधार दिला पाहिजे. आता मुंबई पासिंगची गाडी दारात जरी नुसती थांबली तरी लोक अंगावर धावून येत आहेत. त्यांच्याकडे पाहून तोंडे वाकडी होऊ लागली आहेत.

कोरोनामुळे हा नवा जातीयवाद तयार झाला आहे. तो समाजात दुही निर्माण करणारा आहे. महापूर असो की गावांतील कोणतेही काम असो किंवा नोकरी-धंद्यासाठी तुम्ही मुंबईत गेल्यावर आजपर्यंत तुम्हांला आधार देण्याचे काम याच माणसांनी केले आहे.

आज ते अडचणीत आहेत. अशा काळात त्यांना धीर देण्याची जबाबदारी गावांची आहे. त्यांच्याकडे तपासणीचा आग्रह धरा. मंदिर, शाळांमध्ये त्यांचे विलगीकरण करा, गावांनी त्यांच्या जेवण्याखाण्याची सोय करा. महापुरात भरभरून आलेल्या मदतीच्या ट्रकची आठवण ठेवा. सोशल डिस्टन्सिंग जरूर पाळा; परंतु त्यातून सामाजिक दुरावा निर्माण होईल असे व्यवहार नकोत याची दक्षता दोन्ही पातळ्यांवर घेण्याची गरज आहे.

आम्ही पोट भरण्यासाठी मुंबईत गेलो असलो तरी मूळचे कोल्हापूरचे आहोत. आता आम्ही कुणीतरी दहशतवादी असल्यासारखा अनुभव आमच्याच गाववाल्यांकडून आम्हांला येत आहे. महापूर आला तेव्हा आठ दिवस आम्हांला मुंबईत झोप आली नाही; परंतु आता आमचेच लोक आमच्याकडे माणूस म्हणूनही बघायला तयार नाहीत, याचेच फार वाईट वाटते. हे दिवस पण जातील, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.- भरमू नांगनूरकरअध्यक्षयुवा एकता मंच, मुंबई

वेळ प्रत्येकावर येते. मुंबईकर बांधव रीतसर पोलीस खात्याचा पास घेऊन गावी आले आहेत. त्यांची जरूर सर्व तपासणी व्हावी; परंतु त्यांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जात आहे, ती वेदनादायी आहे. गावाच्या, तालुक्याच्या कोणत्याही संकटात आम्ही आमचा भाऊ अडचणीत आहे असे समजून मदतीला धावून गेलो आणि आता आमच्यावर वेळ आल्यावर मात्र लोक बाजू काढू लागले आहेत, हे योग्य नव्हे.योगेश चव्हाण, अध्यक्ष, नवी मुंबई कोल्हापूर रहिवासी संघ, कोपरखैरणे, मुंबई

दृष्टिक्षेपात मुंबईकरकोल्हापूर जिल्ह्यात १३ मेपासून १६ हजार ७९६ लोक कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत. त्यांतील मुंबई, मुंबई उपनगरे, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांतून १५ हजार १३४ लोक आले आहेत; तर पुणे व सोलापूर या रेड झोनमधील जिल्ह्यांतून १६६२ लोक आले आहेत.

आलेल्या लोकांची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा- ३७८२, गडहिंग्लज- २२४३, चंदगड- १९४१, भुदरगड- १५४१, हातकणंगले- १५२०, कोल्हापूर शहर - १३८३, करवीर- ९८९, शाहूवाडी- ७९९, कागल- ७७९, शिरोळ- ७१४,राधानगरी- ६७५, पन्हाळा- ३६७ आणि गगनबावडा- ६३.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई