शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus मध्य रेल्वेने सुमारे 14 हजार नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 18:17 IST

सोलापूर विभागात कलबुरगी, सोलापूर स्टेशन परिसरामध्ये २२५ गरजू व्यक्तींना खाद्यपदार्थांचे  पाकिटे वाटण्यात आले.

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाकडून गरजू नागरिकांना अन्नदान, जलदान सुरू आहे. 28 मार्चपासून मध्य रेल्वेच्या अन्न जीवन रेखाच्या माध्यमातून सुमारे 14 हजार नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटली आहेत. 

मध्य रेल्वे २८ मार्चपासून मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागातील विविध स्थानकांवर गरजू लोकांना अन्नाची पाकिटे, किराणाच्या वस्तू, बिस्किटे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, फळांचे दान करत आहेत.  28 मार्च रोजी 1 हजार, 29 मार्च रोजी 2 हजार 485, 30 मार्च रोजी 4 हजार 54, 31 मार्च रोजी 6 हजार 474 नागरिकांना अन्नाची पाकिटे देण्यात आली आहेत. 

आयआरसीटीसी, स्वयंसेवी संस्था, वाणिज्यिक कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी इत्यादींच्या  सहकार्याने दररोज अन्नदान केले जाते.  मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक, भायखळा, परळ, लालबाग, हिंदमाता, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, टिळकनगर, घाटकोपर, मुलुंड,  भांडुप, दिवा, मुंब्रा, कल्याण, भिवंडी रोड, इगतपुरी आणि मदनपुरा भागात १ हजार ६८७ खाद्यपदार्थांचे पाकिटांचे गरजू व्यक्तींना वाटप करण्यात आले.

सोलापूर विभागात कलाबुरगी, सोलापूर स्टेशन परिसरामध्ये २२५ गरजू व्यक्तींना खाद्यपदार्थांचे  पाकिटे वाटण्यात आले. पुणे विभागातील पुणे व कोल्हापूर स्टेशन परिसरामध्ये ८५० लोकांना खाद्यपदार्थांचे  पाकिटे वाटण्यात आले. भुसावळ विभागात खंडवा, पाचोरा, नाशिकरोड, देवळाली व भुसावळ स्थानकातील सुमारे १ हजार ५६४ लोकांना खाद्यपदार्थांचे पाकिटे वाटण्यात आले.  यात भुसावळ येथील राज्य सरकारच्या अधिकाय-यांना देण्यात आलेल्या १ हजार२०० खाद्यपदार्थांचे पाकिटांचा समावेश आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, बैतूल आणि हिंगणघाट स्थानकांतील परिसरातील २४८ लोकांना खाद्यपदार्थ पॅकेटचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे