शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

CoronaVirus मध्य रेल्वेने सुमारे 14 हजार नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 18:17 IST

सोलापूर विभागात कलबुरगी, सोलापूर स्टेशन परिसरामध्ये २२५ गरजू व्यक्तींना खाद्यपदार्थांचे  पाकिटे वाटण्यात आले.

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाकडून गरजू नागरिकांना अन्नदान, जलदान सुरू आहे. 28 मार्चपासून मध्य रेल्वेच्या अन्न जीवन रेखाच्या माध्यमातून सुमारे 14 हजार नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटली आहेत. 

मध्य रेल्वे २८ मार्चपासून मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागातील विविध स्थानकांवर गरजू लोकांना अन्नाची पाकिटे, किराणाच्या वस्तू, बिस्किटे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, फळांचे दान करत आहेत.  28 मार्च रोजी 1 हजार, 29 मार्च रोजी 2 हजार 485, 30 मार्च रोजी 4 हजार 54, 31 मार्च रोजी 6 हजार 474 नागरिकांना अन्नाची पाकिटे देण्यात आली आहेत. 

आयआरसीटीसी, स्वयंसेवी संस्था, वाणिज्यिक कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी इत्यादींच्या  सहकार्याने दररोज अन्नदान केले जाते.  मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक, भायखळा, परळ, लालबाग, हिंदमाता, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, टिळकनगर, घाटकोपर, मुलुंड,  भांडुप, दिवा, मुंब्रा, कल्याण, भिवंडी रोड, इगतपुरी आणि मदनपुरा भागात १ हजार ६८७ खाद्यपदार्थांचे पाकिटांचे गरजू व्यक्तींना वाटप करण्यात आले.

सोलापूर विभागात कलाबुरगी, सोलापूर स्टेशन परिसरामध्ये २२५ गरजू व्यक्तींना खाद्यपदार्थांचे  पाकिटे वाटण्यात आले. पुणे विभागातील पुणे व कोल्हापूर स्टेशन परिसरामध्ये ८५० लोकांना खाद्यपदार्थांचे  पाकिटे वाटण्यात आले. भुसावळ विभागात खंडवा, पाचोरा, नाशिकरोड, देवळाली व भुसावळ स्थानकातील सुमारे १ हजार ५६४ लोकांना खाद्यपदार्थांचे पाकिटे वाटण्यात आले.  यात भुसावळ येथील राज्य सरकारच्या अधिकाय-यांना देण्यात आलेल्या १ हजार२०० खाद्यपदार्थांचे पाकिटांचा समावेश आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, बैतूल आणि हिंगणघाट स्थानकांतील परिसरातील २४८ लोकांना खाद्यपदार्थ पॅकेटचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे