शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोरोनाला ‘नो लिमिट’, कितीही वेळा होऊ शकतो; आजार टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

By अमित महाबळ | Updated: August 23, 2022 19:58 IST

कोरोनाला आता फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. त्याला सोबत घेऊन जगण्याची लोकांना सवय झाली आहे. कोरोनाला अटकाव करण्यात मास्कचे काम महत्त्वाचे आहे पण त्याचा वापर कमी झाल्याचे दिसते.

अमित महाबळ 

जळगाव : कोरोना एकदा होऊन गेला म्हणजे पुन्हा होणार नाही, असे नाही. बरे तो कितीदा होईल याचेही निश्चित गणित नाही. ‘नो लिमिट’ एवढेच त्यावरील उत्तर आहे. तो कितीही वेळा होऊ शकतो, असा गंभीर इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.

कोरोनाला आता फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. त्याला सोबत घेऊन जगण्याची लोकांना सवय झाली आहे. कोरोनाला अटकाव करण्यात मास्कचे काम महत्त्वाचे आहे पण त्याचा वापर कमी झाल्याचे दिसते. कोरोनाची रुग्ण संख्या अजूनही पूर्णपणे शून्यावर आलेली नाही. त्यामुळे कोरोना हद्दपार झाला असल्याचे म्हणता येत नाही. कोरोना एकदा होऊन गेल्यावर पुन्हा होणार नाही, अशा विचारामध्ये अनेकजण असतात. मात्र, असे मानणे चुकीचे आहे. कोरोना एकाच व्यक्तीला किती वेळा होईल या प्रश्नावर ‘नो लिमिट’, असे उत्तर आहे. तो कितीही वेळा होऊ शकतो. जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी यामागील स्पष्ट केले.

हे आहे कारण 

डॉ. किशोर इंगोले यांनी सांगितले, की कोरोना व अन्य आजारांचे विषाणू यामध्ये फरक आहे. व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे यावर त्याला कोरोना होणे वा ना होणे अवलंबून आहे. या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून नैसर्गिक संरक्षण (रोग प्रतिकार शक्ती) मिळाले पाहिजे. ते मिळत नाही म्हणून लस घेणे आवश्यक असते. ज्यांनी लस घेतली आहे, त्यांच्यात कोरोना होण्याचे प्रमाण कमी आहे. अन्य आजारांच्या विषाणूंमध्ये रुग्णाच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती तयार होते आणि ती त्या आजाराशी सामना करण्यात तेवढीच परिणामकारक असते मात्र, कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी शरीरात नैसर्गिकरित्या प्रतिकार शक्ती तयार होत नाही.

टेस्टबाबात ही काळजी घ्या

कोरोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आल्यास त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी. यामधील ज्या रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह येईल त्यांना स्वाईन फ्लू झालेला असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय उपचारासाठी फिजिशियनचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. किशोर इंगाले यांनी सांगितले.

जळगाव शहरात १२ रुग्ण

गेल्या २४ तासांत जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जळगाव शहरातील रुग्णांची संख्या १२ झाली आहे, तर जिल्ह्यात १ रुग्ण आहे. सोमवारी जळगाव शहर वगळता जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता.

स्वाईन फ्लूची लक्षणे

ताप, घसादुखी, घशात खवखव होणे, खोकला, सर्दी, अंगदुखी व डोकेदुखी आदी लक्षणे जाणवत असल्यास गर्दीमध्ये जाऊ नये. मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी तसेच गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावी.

आजार टाळण्यासाठी

- साबण, तसेच स्वच्छ पाण्याने हात वारंवार धुवावेत, हस्तांदोलन टाळावे.- पौष्टिक आहार घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारातील वापर वाढवा.- धूम्रपान करू नका.- शिंकताना किंवा खोकताना हातरुमालाचा वापर करा.- हातरुमाल रोज बदला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या