शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मंत्रिमंडळात वर्णीसाठी रस्सीखेच

By admin | Updated: October 20, 2014 00:39 IST

राज्यात भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे मानले जात आहे. असे झाले तर सत्ताकेंद्र म्हणून महत्त्व आलेल्या नागपूरला

तेली, कुणबी, दलित समीकरण : खोपडे, बावनकुळे, देशमुख, माने स्पर्धेतकमलेश वानखेडे - नागपूरराज्यात भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे मानले जात आहे. असे झाले तर सत्ताकेंद्र म्हणून महत्त्व आलेल्या नागपूरला मंत्रिमंडळातही मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदे देताना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सामाजिक निकषांचा आधार घेतला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे आमदारांमध्ये मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.तेली समाज बऱ्यापैकी भाजपच्या बाजूने झुकला आहे. पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे व कामठीतून चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही आमदार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या जाहीर सभेत ज्येष्ठ नेत्यांनी ‘तुम्ही निवडून आणा, आम्ही लालबत्ती देतो’, असे आवाहन मतदारांना केले होते. खोपडेंनी दुसऱ्यांदा विजय नोंदविला तर बावनकुळे यांनी हॅट्ट्रिक मारली आहे. खोपडे यांनी ४८ हजारावर मतांनी तर बावनकुळे यांनी ४० हजारावर मतांनी विजय नोंदवीत जनमत आपल्यासोबत असल्याचे सिद्ध केले आहे. आता या दोन नेत्यांपैकी एकाची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण संधी कुणाला द्यायची, यावरून पक्षापुढे पेच निर्माण होऊ शकतो. कुणबी समाजातून असलेले सुधाकर देशमुख, समीर मेघे, आशिष देशमुख, सुधाकर कोहळे हे चार आमदार विजयी झाले आहेत. यात सुधाकरराव देशमुख हे सिनिअर आहेत. शिवाय दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रचार प्रमुख तर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता जास्त आहे. असे असले तरी समीर हे माजी खा. दत्ता मेघे यांचे पुत्र तर आशिष हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. दोन्ही नेते दिग्गज असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी मेघे-देशमुखांकडून पक्षावर दबाव बनविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. मिलिंद माने हे दलित समाजाचे नेते आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून ३५ हजारावर मते घेतली होती. यावेळी भाजपने त्यांना संधी देताच त्यांनी बाजी मारली. नागपूर जिल्ह्यात भाजपला डॉ. माने यांच्या रूपात एक सुशिक्षित व आंबेडकरी चळवळीत पकड असलेला दलित चेहरा मिळाला आहे. भविष्यातील भाजप समोरची आव्हाने विचारात घेता डॉ. माने यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.