शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बालगोविंदांच्या परवानगीसाठी समन्वय समितीची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 00:59 IST

१२ वर्षांखालील गोविंदाना दहीहंडी उत्सवात सामील न होण्याचा निर्णय २०१४ साली घेण्यात आला. मात्र त्यानंतर उत्सवावरील वादाचे सावट वाढत गेले. आता पुन्हा या उत्सवाचे वेध

मुंबई : १२ वर्षांखालील गोविंदाना दहीहंडी उत्सवात सामील न होण्याचा निर्णय २०१४ साली घेण्यात आला. मात्र त्यानंतर उत्सवावरील वादाचे सावट वाढत गेले. आता पुन्हा या उत्सवाचे वेध लागल्याने दहीहंडी समन्वय समितीने याविषयीच्या ठोस निर्णयासाठी राजकीय पक्षांकडे धावाधाव सुरु केली आहे.बालगोविंदांच्या उत्सव सहभागातील बंदीनंतरही काही पथकांनी थरांवरील एक्क्याचे वय लपवित निर्णयाकडे दुर्लक्ष केले. मात्र या निर्णयानंतर पोलीस यंत्रणाही याविषयी अधिक सजग झाल्याने दहीहंडी पथकांना याचा फटकाही सहन करावा लागला. गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणी बालगोविंदांच्या सहभागामुळे हंडीच्या सरावांना अटकाव करण्यात आला होता. त्यामुळे आजमितीस, या उत्सवावरील वादाची किनार कायम आहे.यावरच उपाय शोधण्याकरिता सध्या दहीहंडी समन्वय समिती राजकीय पक्षांच्या पायऱ्या झिजवत आहे. २९ जुलै रोजी उच्च न्यायालयात अवमान याचिकेवर होणाऱ्या सुनावणीपूर्वी बालगोविंदाचा विषय निकालात निघावा, यासाठी समन्वय समितीची धावाधाव सुरु आहे. एरव्ही दहीहंडींच्या बैठकांसाठी पुढाकार घेणारे भाजपचो मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही या निर्णयाविषयी कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याची खंत गोविंदांकडून व्यक्त होते आहे. तर महाराष्ट्राच्या सण-उत्सवांचे पाठीराखे असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सत्ताधारी असो वा विरोधक कुणीही का असेना, पण बालगोविंदांचा प्रश्न मिटवा यासाठी समन्वय समितीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. २९ जुलैला याबाबत नक्की काय होते ते कळणार आहे. (प्रतिनिधी)