शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बालगोविंदांच्या परवानगीसाठी समन्वय समितीची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 00:59 IST

१२ वर्षांखालील गोविंदाना दहीहंडी उत्सवात सामील न होण्याचा निर्णय २०१४ साली घेण्यात आला. मात्र त्यानंतर उत्सवावरील वादाचे सावट वाढत गेले. आता पुन्हा या उत्सवाचे वेध

मुंबई : १२ वर्षांखालील गोविंदाना दहीहंडी उत्सवात सामील न होण्याचा निर्णय २०१४ साली घेण्यात आला. मात्र त्यानंतर उत्सवावरील वादाचे सावट वाढत गेले. आता पुन्हा या उत्सवाचे वेध लागल्याने दहीहंडी समन्वय समितीने याविषयीच्या ठोस निर्णयासाठी राजकीय पक्षांकडे धावाधाव सुरु केली आहे.बालगोविंदांच्या उत्सव सहभागातील बंदीनंतरही काही पथकांनी थरांवरील एक्क्याचे वय लपवित निर्णयाकडे दुर्लक्ष केले. मात्र या निर्णयानंतर पोलीस यंत्रणाही याविषयी अधिक सजग झाल्याने दहीहंडी पथकांना याचा फटकाही सहन करावा लागला. गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणी बालगोविंदांच्या सहभागामुळे हंडीच्या सरावांना अटकाव करण्यात आला होता. त्यामुळे आजमितीस, या उत्सवावरील वादाची किनार कायम आहे.यावरच उपाय शोधण्याकरिता सध्या दहीहंडी समन्वय समिती राजकीय पक्षांच्या पायऱ्या झिजवत आहे. २९ जुलै रोजी उच्च न्यायालयात अवमान याचिकेवर होणाऱ्या सुनावणीपूर्वी बालगोविंदाचा विषय निकालात निघावा, यासाठी समन्वय समितीची धावाधाव सुरु आहे. एरव्ही दहीहंडींच्या बैठकांसाठी पुढाकार घेणारे भाजपचो मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही या निर्णयाविषयी कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याची खंत गोविंदांकडून व्यक्त होते आहे. तर महाराष्ट्राच्या सण-उत्सवांचे पाठीराखे असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सत्ताधारी असो वा विरोधक कुणीही का असेना, पण बालगोविंदांचा प्रश्न मिटवा यासाठी समन्वय समितीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. २९ जुलैला याबाबत नक्की काय होते ते कळणार आहे. (प्रतिनिधी)