शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सहकार, साखर उद्योगासाठी ठोस काहीच नाही

By admin | Updated: March 1, 2016 03:37 IST

देशाच्या ग्रामीण अर्थकारणातील रोजगार आधारित महत्त्वाचा उद्योग असलेल्या साखर उद्योगाचा उल्लेख अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाता-जाता केला.

विश्वास पाटील, कोल्हापूर देशाच्या ग्रामीण अर्थकारणातील रोजगार आधारित महत्त्वाचा उद्योग असलेल्या साखर उद्योगाचा उल्लेख अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाता-जाता केला. सहकार क्षेत्राची दखलही या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेली नाही. साखर उद्योग सध्या ‘एफआरपी’च्या ‘क्रायसिस’मधून जात आहे. त्याबद्दल अर्थमंत्री काही तरी ठोस धोरण मांडतील याबद्दलच्या आशा मात्र फोल ठरल्या.कृषी व ग्रामीण विकासावर जास्त निधीची तरतूद केल्याचे दिसते. त्याची तशी महत्त्वाची दोन-तीन कारणे आहेत. एक तर कृषी विकासाचा दर केंद्र शासनाला १.१ टक्क्यावर न्यायचा आहे. देशाच्या एकूण विकासदराने ७.७५ टक्क्यांचा पल्ला गाठावयाचा असेल, तर कृषी विकासाचा दर पुढे सरकल्याशिवाय ते शक्य होत नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे भाजपाचे सरकार हे मध्यमवर्गीय व कॉर्पोरेटवाल्यांचे हित जास्त जपते, अशी भावना जनमानसांत तयार झाली आहे. देश येत्या काही काळात सहा प्रमुख राज्यांतील निवडणुकांना सामोरा जात आहे. तेथे सत्ताधारी भाजपाची कसोटी लागणार आहे. म्हणूनही शेतकरी व ग्रामीण जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्याचे दिसत आहे.साखर उद्योगामध्ये अगोदर पक्क्या मालाची किंमत निश्चित केली जाते व त्यानंतर कच्च्या मालाचा दर काढला जातो. त्यामुळे प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना एफआरपीसाठी संघर्ष करावा लागतो. तो करावा लागू नये व किमतीतील अनिश्चिततेच्या काळात कारखानदारीस मदत करू शकेल असा किंमत स्थिरता निधी स्थापन करण्याची सूचना कृषी मूल्य आयोगाने केली होती. त्या आयोगाची स्थापना करण्यासंबंधीचे सूतोवाच अर्थमंत्री अर्थसंकल्पात करतील, अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली आहे. मागच्या दोन हंगामातही कारखानदारीसमोर अडचणी होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची बिले देण्यासाठी केंद्र शासनाने जे कर्ज दिले त्याची परतफेड यंदाच्या एप्रिलपासून सुरू होत आहे; परंतु या वर्षीही या उद्योगाची स्थिती ऋण काढून सण करण्यासारखीच आहे. त्यामुळे मागच्या कर्जाची पुनर्रचना करून कारखानदारीस तूर्त कर्ज परतफेडीच्या हप्त्यातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. त्याबद्दलही निराशा झाली आहे. केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेले कर्ज बिनव्याजी आहे. त्यास मुदतवाढ दिली तर त्याचे व्याज कोण भरणार, असा प्रश्न तयार झाल्याने त्याबाबत काहीच निर्णय न घेतल्याचे दिसते आहे.