शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

राज्य कामगार विमा योजनेचे महामंडळामध्ये रूपांतर

By admin | Updated: June 1, 2016 04:42 IST

राज्य कामगार विमा योजनेचे रूपांतर राज्य कामगार विमा महामंडळात करण्याचा निर्णय राज्य मंत्रिपरिषदेच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : राज्य कामगार विमा योजनेचे रूपांतर राज्य कामगार विमा महामंडळात करण्याचा निर्णय राज्य मंत्रिपरिषदेच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेचा लाभ २४ लाख कामगारांना मिळतो. १८ जिल्ह्यांमधील १३ रुग्णालये, ६१ सेवा दवाखाने आणि ५०६ विमा वैद्यकीय व्यवसायांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या या योजनेचे संपूर्ण नियंत्रण आता महामंडळाकडे असेल. या योजनेसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. कामगार विम्यापोटी विविध आस्थापनांकडून घेण्यात येणारी रक्कम आता महामंडळात जमा होईल. आतापर्यंत दुहेरी नियंत्रणात असलेल्या या योजनेच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अलीकडेच ईएसआय अधिनियमात सुधारणा करून, राज्यस्तरीय कामगार विमा महामंडळ स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्या अंतर्गत राज्य सरकारने आजचा निर्णय घेतला. या महामंडळासाठी पहिल्या तीन वर्षांचा संपूर्ण खर्च हा केंद्र सरकार करणार असून, त्यानंतर ९० टक्के खर्चही केंद्रच करणार आहे. (विशेष प्रतिनिधी)नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयात विविध विभागांत अध्यापकांसह वर्ग तीन आणि वर्ग चारच्या पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली. यामुळे अतिविशेषोपचार रु ग्णालयासाठी १०० नियमित पदांसह इतर ३५ पदे, तर ट्रॉंमा सेंटरसाठी १४७ नियमित पदांसह इतर ३३ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयात डी. एम.एम.सी.एच. हा अभ्यासक्र म सुरू करण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार कार्यवाही करत, पदांच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणावरील अध्यक्ष व सदस्यांच्या काही कारणास्तव मध्येच खंडित झालेल्या जागा भरण्यासाठीची तरतूद महाराष्ट्रजलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमात नव्याने करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यास मंत्रिपरिषदेने मान्यता दिली.