शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
2
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
3
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
4
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
7
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
8
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
9
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
10
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
11
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
12
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
13
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
14
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
15
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
16
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
17
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
18
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
19
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

अधिवेशनाचे सूप वाजले, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग - विरोधकांची टीका

By admin | Updated: December 24, 2014 17:02 IST

प्रत्यक्ष रोख मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षात थांबलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या पुन्हा सुरू झाल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

नागपूर, दि. २४ - राज्यातील शेतक-याबाबत सरकारच्या संवेदना संपल्याचे चित्र अधिवेशनातून पाहायला मिळाले असून प्रत्यक्ष रोख मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षात थांबलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या पुन्हा सुरू झाल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप बुधवारी वाजले. त्यापार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही टीका करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही यावेळी सरकारवर टीका केली.आघाडी सरकारने दुष्काळग्रस्त शेतक-यांना रोख ९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. त्याबरोबरच इतर अनेक माध्यमातून दुष्काळमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने  आत्महत्येचे सत्र गेल्या चार वर्षात थांबले होते. त्यावेळी सरकार आपल्या पाठिशी असल्याची जाणीव शेतक-याला होती अशी आठवणही विखे पाटील यांनी करुन दिली. केंद्रीय पथकाने शेतक-यांची थट्टा केली. तर दुसरीकडे कापूस उत्पादक शेतक-याच्या घरात कापूस आहे पण खरेदीकेंद्र सुरू करण्याबाबत अनास्था दाखवली जात आहे. दूध उत्पादक शेतक-याचीही उपेक्षा वाढली आहे. काहीही विचारले तर आम्ही केंद्राकडे मागणी केली असल्याचे उत्तर देऊन राज्य सरकार मोकळे होते. यावरुन  राज्य सरकार जनतेला मदत करण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले, अशा शब्दांत विखे पाटील यांनी सरकारचा समाचार घेतला.