शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

अधिवेशन चालू देणार नाही

By admin | Updated: July 11, 2015 02:06 IST

मराठवाडा, विदर्भात चार महिन्यांत १२०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र, राज्य सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नाही

औरंगाबाद : मराठवाडा, विदर्भात चार महिन्यांत १२०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र, राज्य सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १४ जुलैपासून सुरू होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी औरंगाबादेत दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हा काँगे्रसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व चव्हाण यांनी केले. माजी मंत्री अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव औताडे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, सततचा दुष्काळ आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात आहे हे आम्ही सरकारला वारंवार सांगत आहोत. मात्र, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अमेरिका, लंडन येथे जाण्यास वेळ आहे. मात्र, शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासासाठी त्यांच्याकडे आणि मंत्र्यांकडे वेळ नाही. शासनाच्या या धोरणाचा आम्ही निषेध करतो. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारविरुद्ध काँग्रेसनेएल्गार पुकारला आहे. आम्ही सत्तेवर असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपये, तर मी मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने सहा हजार पाचशे कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. (प्रतिनिधी)