शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

अधिवेशन चालू देणार नाही

By admin | Updated: July 11, 2015 02:06 IST

मराठवाडा, विदर्भात चार महिन्यांत १२०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र, राज्य सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नाही

औरंगाबाद : मराठवाडा, विदर्भात चार महिन्यांत १२०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र, राज्य सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १४ जुलैपासून सुरू होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी औरंगाबादेत दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हा काँगे्रसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व चव्हाण यांनी केले. माजी मंत्री अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव औताडे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, सततचा दुष्काळ आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात आहे हे आम्ही सरकारला वारंवार सांगत आहोत. मात्र, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अमेरिका, लंडन येथे जाण्यास वेळ आहे. मात्र, शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासासाठी त्यांच्याकडे आणि मंत्र्यांकडे वेळ नाही. शासनाच्या या धोरणाचा आम्ही निषेध करतो. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारविरुद्ध काँग्रेसनेएल्गार पुकारला आहे. आम्ही सत्तेवर असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपये, तर मी मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने सहा हजार पाचशे कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. (प्रतिनिधी)