शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

अधिवेशनात ‘अणे’वाणी तापणार

By admin | Updated: December 7, 2015 02:15 IST

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्रातील हुतात्म्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. ‘विदर्भासाठी १०६ हुतात्मे झाले हे मुंबईकरांचे थोतांड आहे,

नागपूर : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्रातील हुतात्म्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. ‘विदर्भासाठी १०६ हुतात्मे झाले हे मुंबईकरांचे थोतांड आहे,’ असा आरोप करणारे अणे यांना मुख्यमंत्र्यांनी तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तापणार अशीच चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान, महाधिवक्ता अणे यांचे वक्तव्य वैयक्तिक असून, त्याच्याशी शासनाचा संबंध नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.विदर्भ महाराष्ट्रात यावा यासाठी १०६ जण हुतात्मे झाले, असे मुंबईकरांचे सांगणे म्हणजे थोतांड आहे. मुळात त्यांनी मुंबईसाठी हौतात्म्य पत्करले होते. विदर्भ राज्याची निर्मिती शक्य आहे. जनतेलाही तेच हवे आहे व यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा, असे अणे शनिवारी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हल्लाबोल केला. अणे राज्याचे महाधिवक्ता आहेत. त्यांचे असे मत दुर्दैवी आहे. ते कायदेशीर पदावर असून, घटनेची पायमल्ली करणारे वक्तव्य करणारी व्यक्ती या पदावर राहूच शकत नाही. बेजबाबदार वक्तव्य केल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. दुष्काळ, शेतकरी प्रश्न, महागाई, गुन्हेगारी यापासून लक्ष भरकटविण्यासाठीच अधिवेशनाच्या अगोदर असे वक्तव्य जाणूनबुजून केल्याचा आरोपही त्यांनी केला. महाधिवक्ता अणे यांच्याकडे राज्य शासन विविध कायदेशीर प्रकरणात मत मागते. आता विदर्भाबाबतचे त्यांचे मत म्हणजे राज्य शासनाचेच मत आहे. राज्यातील जनतेचा हा अपमान असून, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात यावर स्पष्टीकरण द्यावे, असे मुंडे म्हणाले.संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांबद्दलचे माझे वक्तव्य अनादर करणारे नव्हते. इतिहासाला धरून ते वस्तुनिष्ठ वक्तव्य आहे. विदर्भासाठी नव्हे तर मुंबई महाराष्ट्रातून जाऊ नये यासाठी हुतात्म्यांनी बलिदान केले होते. त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावर कायम आहे. जनतेला विदर्भ नको म्हणणारे नेते कांगावा करत आहेत. काही संस्थांच्या जनमत चाचणीत जनतेने विदर्भाच्या बाजूने कौल दिला होता. केंद्र शासनाने यासंदर्भात पुढाकार घ्यावा, हे माझे मत आजही कायम आहे.- श्रीहरी अणे, महाधिवक्ता शिवसेनेची तक्रारअणे यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, वक्तव्य तपासण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे परिवहन मंत्री रावते यांनी सांगितले. अणे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे अथवा विदर्भाच्या प्रतिनिधित्वाकरिता या जागेचा पुनर्विचार करावा, असे ते म्हणाले.