शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

प्रत्युषा प्रकरणी राहुल राज विरुद्ध गुन्हा

By admin | Updated: April 6, 2016 05:01 IST

बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या प्रकरणात राहुल प्रत्युषाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई : बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या प्रकरणात राहुल प्रत्युषाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्युषाचे अजूनही माजी प्रियकरांसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन राहुल तिचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे प्रत्युषाने तिच्या काकूला सांगितले होते. ही बाब प्रत्युषाच्या आईला कळल्यावर त्यांनी मंगळवारी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन बांगुरनगर पोलिसांनी राहुलविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अंबरनाथमध्ये प्रत्युषाचे काका दिपांकर बॅनर्र्जी आणि काकू बर्नाली बॅनर्जी राहतात. जानेवारी ते मार्च या दरम्यान प्रत्युषाने तीन वेळा काकींची भेट घेतली होती. त्यावेळी राहुल तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याबाबत तिने काकूला सांगितले होते. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली असल्याचे काकूचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी प्रत्युषाच्या आईला (सोमा बॅनर्जी) सांगितले होते. मंगळवारी सोमा बॅनर्जी यांनी बांगुरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, प्रियकर राहुल राज सिंगविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, मानसिक तसेच शारीरिक छळ करणे, शिविगाळ करणे, मारहाण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी वर्तवली आहे. >लाईफ ईज वेरी डिफिकल्ट पापाच्प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंग याच्याविरुद्ध बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आईच्या भावानांचाही बांध फुटला. राहुलने आम्हालाही प्रत्युषापासून दूर केला असल्याचा आरोप प्रत्युषाच्या आईने केला आहे. त्यात आत्महत्येच्या तीन दिवसापूर्वीच प्रत्युषाने वडीलांकडे आपले दुख मांडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिने’लाईफ इज वेरी डिफिकल्ट पापा’ असे तिने वडिलांना सांगितले होते. च्सोमा बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने नेहमी आम्हाला प्रत्युषापासून दुर ठेवले. आम्ही रांचीचे बाहुबली असून माझ्याकडे खूप पैसा असल्याचे त्याने प्रत्युषाला सांगितले होते. आम्ही त्याच्याबाबत जास्त चौकशी करत असल्याने त्याने आम्हाला नेहमी तिच्यापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही राहुलच्या कुटुंबीयांना कधीच भेटलो नाही. प्रत्युषानेही तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत काहीच सांगितले नाही. ३० मार्च रोजी जेव्हा प्रत्युषासोबत तिच्या वडिलांशी बोलणे झाले तेव्हा ती फार दु:खी वाटत होती. कामाच्या ताण असेल म्हणून आम्ही तिची समजूत काढली. तेव्हाच जर प्रत्युषाने आम्हाला सांगितले असते तर ही वेळच आली नसती असेही बॅनर्जी यांनी सांगितले.