शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

कल्याण-नेवाळीतील परिस्थिती नियंत्रणात, परिसरात कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 17:30 IST

नेवाळी येथील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी याठिकाणी उपस्थित आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि 22 -  नेवाळी येथील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी याठिकाणी उपस्थित आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी कल्याण- मलंगगड रस्ता ग्रामस्थांनी रोखून धरला होता. विमानतळ जमीन संपादनाला विरोध म्हणून शेतक-यांनी हा रस्ता रोको होता. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्यात येत आहे असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.      
 
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात येथील १,६०० एकर जागा ताब्यात घेण्यात आली होती. या जागेवर संरक्षण विभागातर्फे संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु करण्यावरून स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. 
 
त्यानुसार गुरुवारी रस्ता रोकोची नोटीस देण्यात आली होती अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त ( गुन्हे) मकरंद रानडे यांनी दिली.  भाल व परिसरातील आंदोलनकर्त्यांनी नवी मुंबई, बदलापूर कडे जाणाऱ्या रस्त्यांवर टायर्स जाळून वाहतुक रोखून धरली होती. तसेच पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली एका गाडीची जाळपोळ झाली तसेच एक-दोन पोलीस  यात जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
मात्र पॅलेट गनचा वापर केल्याबाबत त्यांनी काही माहिती दिलेली नाही. सनदशीर मार्गाने आपले म्हणणे मांडावे व हिंसा करु नये असे, आवाहन पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी केले आहे.      
 
दरम्यान. १९९४ पर्यंत  नेवाळी परीसरातील जागेच्या सातबाऱ्यावर शेतकऱ्यांची नावे होती तसेच सदरची जागा संरक्षण खात्याने भाडेतत्वावर घेतल्याचे कागदपत्र शेतकऱ्यांकडे आहेत. त्यामुळे कोणतीही भरपाई न देता नावावर केलेल्या सदर जमिनीच्या सातबाऱ्यावरील संरक्षण खात्याच्या नोंदी  कमी कराव्यात. केंद्र सरकाराने थेट शेतक-यांशी चर्चा करावी कोणीही राजकिय नेता मघ्ये न टाकता शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकरी आणि केंद्र सरकार यांनी बसून सोडवावा आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा अशी मागणी मनसेचे सरचिटणीस राजू (प्रमोद) पाटील यांनी केली आहे.
 
 
 
(नेवाळी विमानतळाची जागा परत द्या)                  
काय आहे नेमके प्रकरण?
 
स्वातंत्र्यपूर्व भारतात १९४२ सालच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेवाळी येथे ब्रिटिश सैन्याने एक हजार ६५० एकर जागा संपादित करून विमानतळ उभारले होते. मात्र, ही जागा केंद्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांना परत केलेली नाही. या जागेवर आता नौसेनेने ताबा घेतला आहे. तेथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. 
 
१९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने नेवाळी परिसरात संपादित केलेली एक हजार ६५० एकर जागा आजपासच्या १८ गावांतील शेतकऱ्यांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने ही जागा शेतकऱ्यांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ही जागा संरक्षण खात्याकडे वर्ग केली. संरक्षण खात्याने ही जागा नौसेनेला दिली आहे. या जागेवर नौसेनेने संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या जागा परत न करता तेथे संरक्षण भिंत उभारण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.